Thursday, 13 February 2020

मानसशास्त्राचा नियम : पालक शिक्षक संबंध आणि विद्यार्थी विकास

जिथे पालक शिक्षकांशी उद्धटपणे वागतात तिथे विद्यार्थ्यांची प्रगती खुंटते. मानसशास्त्राचा नियम आहे..!


येत्या १० वर्षातील शिक्षकांना वर्गामध्ये क्लास कंट्रोल करणे कठीण होऊ लागले. ADHD, Learning Disabilities, Lack of Concentration यासारख्या समस्यांचे प्रमाण वाढले. वर्गातील दोन-तीन टग्या मुलांमुळे अख्खा वर्ग डिस्टर्ब होऊ लागला. त्यात हायपरऍक्‍टिव्ह मुलांच्या समस्या वेगळ्याच होत्या. त्या हाताळायच्या कशा हा शिक्षकांसमोर प्रश्न पडला.

शिक्षण हक्क कायद्याच्या गैरवापरामुळे विद्यार्थ्यांना मारणे सोडा साधे रागावणे कठीण होऊन बसलेआहे . शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यावी तर काय द्यावी हा प्रश्न पडला. वर्गाच्या बाहेर काढले तर पालक भांडायला येतात की तो/ती वर्गाच्या बाहेर राहिल्याने तिचे शैक्षणिक नुकसान झाले. वर्गात उभे केले तर पालक ओरडतात की त्याच्या मानसिकतेवर परिणाम झाला, आता तो शाळेत यायला नाही म्हणतो.
कान पकडून उठाबशा काढायला सांगितले तर पालक दुसऱ्या दिवशी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन येतात.
खूप त्रास देतो म्हणून कुठल्या ऍक्टिव्हिटी मधून काढून टाकले तर लगेच पालक म्हणतात आम्ही फी भरली आहे त्याला ॲक्टिव्हिटीमध्ये घ्या. तशी स्कूल डायरी मध्ये नोट्स येते. टीचरने त्याच्याशी बोलणे सोडले तर पालक लगेच म्हणतात पाहू टीचर किती दिवस बोलत नाही तुझ्याशी. . तू स्वतःहून बोलू नकोस. . प्रिन्सिपल ला सांगून तिला तुझ्याशी बोलायला मी भागच पाडते.. अशी कशी टीचर बोलत नाही पाहू.

म्हणजे मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षा द्यायचीच नाही पण शिस्तीची अपेक्षा शाळेकडून नेहमी ठेवायची. विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळत असेल तर त्याबरोबर कर्तव्य सुद्धा पूर्ण करायचे असतात, जबाबदारीसुद्धा पाळायची असते याचा संस्कारच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजत नाही. *शिक्षक हे सुधारण्याचे प्रवेशद्वार असते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेम आणि स्वातंत्र्य देऊन त्यांची मनं जिंकायची असतात पण हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये शिस्त लावण्यासाठी काही अधिकार शिक्षकांना सुद्धा लागतात.* *मारणे, जबर शिक्षा करणे हे अघोरीच आहे ते केव्हाच कालबाह्य झाले आहे आणि आजकालचे शिक्षक याचे समर्थनपण करणार नाहीत पण सध्याच्या काळात साधे रागावणे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी छोट्या-छोट्या शिक्षा करणे सुद्धा पालकांच्या दबावापोटी बंद झाले आहे. याचा विद्यार्थ्यांवर दूरगामी खूप वाईट परिणाम होतो.* विद्यार्थ्यांना अपमान पचवण्याचे मानसिक धैर्य राहत नाही. असे विद्यार्थी तरुणपणी लवकरच नैराश्याच्या विहिरीत पडतात. मला कोणी रागवत असेल तर ते माझ्या फायद्यासाठी आहे. . कुणीही शिक्षक आनंदासाठी, काट काढण्यासाठी, दुसऱ्याचा राग विद्यार्थ्यांवर काढण्यासाठी विद्यार्थ्याला रागवत नसतात. ते रागवतात याचा सरळ अर्थ विद्यार्थी कुठेतरी चुकतो आहे पण विद्यार्थ्यांची धारणा होऊन जाते की मला कोणीही रागवू नये ओरडू नये. या धारणेने विद्यार्थी मोठा होतो आणि मग पुढे आयुष्यात वावरताना नोकरी करताना व्यवसायामध्ये, समाजात लोकांशी वागतांना जड जाते. कारण जग आपल्या म्हणण्यानुसार नाही चालत. *आयुष्यात मान-अपमान हे दोन्ही येत राहते. मारणं हे अयोग्यच त्याला मी काय कोणीही समर्थन करणार नाही पण वर्गात रागावणं सुद्धा आजकाल बंद झाले आहे त्यामुळे अपमान कसा सहन करावा आणि त्यातून self analysis कसे करावे ही प्रक्रियाच मुलांच्या मनांत होत नाही. जी सर्वंगीण विकासासाठी आवश्यक आहे.*

काही झाले की पालक शिक्षकांशी चर्चा करायला येतात ज्यामध्ये चर्चेचा सूर कमी आणि कोर्टात जसे आरोपीला प्रश्न विचारतात तसेच पालक शिक्षकांना विचारतात. या सर्व संवादामुळे मुलांच्या मनात शिक्षकांविषयीचा आदर निघून जातो आणि विद्यार्थी हेच शिकतो की मला काही अडचण आली तर आहे माझी आई. त्याच्या प्रत्येक (चुकीच्या) निर्णयांमध्ये आई सहभागी होते. ती स्वतः निर्णय घेते. . *ती इतकी involve होते की त्याचा अपूर्ण राहिलेला होमवर्क, प्रोजेक्ट, अभ्यास ती स्वतः पूर्ण करते. पाल्य दुसऱ्यांवर अवलंबून राहायला शिकतो.* स्वावलंबनाचे धडे लहानपणी द्यायचे असतात ते ती विसरून जाते. *ही मुलं मोठी झाली आणि घरात आग लागली तरी फायर ब्रिगेडला फोन करायचा असतो हे सुद्धा त्यांना लवकर सुचत नाही एवढे ठोम्बे बनतात कारण लहानपणापासून मुलांसाठी आपण Ready made answer देत होतो.*

 . जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आदर असतो, श्रद्धा असते तेव्हा शिक्षक जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा अंतर्मनाची द्वारे आपोआप उघडली जातात* आणि शिक्षक जे शिकवतात ते लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते. जेव्हा पालक विद्यार्थ्यांसमोर त्यांच्या वर्ग शिक्षकांशी उद्धटपणे बोलतात किंवा सातत्याने भेटून तक्रारीचा पाढाच गात राहतात तिथे पाल्याच्या मनातील शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत आहे.. [ संकलन ]

Monday, 6 January 2020

महाराष्ट्राचे नवीन 20 - 20 मंत्रिमंडळ

*अखेर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप जाहीर*
       
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,

अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

*शिवसेना*

एकनाथ शिंदे-  नगरविकास
सुभाष देसाई - उद्योग
संजय राठोड - वनमंत्री
अनिल परब -परीवहन
उदय सामंत, उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे - पर्यावरण
दादा भुसे - कृषी मंत्रालय
गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा
संदिपान भुमरे- रोजगार हमी
शंकर गडाख- जलसंधारण

*राष्ट्रवादी काँग्रेस*

अजित पवार -अर्थ मंत्री
अनिल देशमुख - गृह मंत्री
छगन भुजबळ - अन्न नागरी पुरवठा
जयंत पाटील- जलसंपदा
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय
दिलीप वळसे पाटील- उत्पादन शुल्क
नवाब मलिक - अल्पसंख्यांक मंत्रालय
बाळासाहेब पाटील - सहकार
जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण
हसन मुश्रीफ- ग्रामविकास
राजेश टोपे- आरोग्य
राजेंद्र शिंगणे- अन्न व औषध 

*काँग्रेस*

बाळासाहेब थोरात -महसूल
अशोक चव्हाण -सार्वजनिक बांधकाम
नितिन राऊत - ऊर्जा
*वर्षा गायकवाड -शालेय शिक्षण मंत्री*
के.सी पाडवी -आदिवासी विकास
अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
विजय वडेट्टीवार - मदत आणि पुनर्वसन खार जमीन
यशोमती ठाकूर - महिला बालविकास
अस्लम शेख - बंदर विकार,वस्त्रउद्योग आणि मत्स संवर्धन

सुनिल केदार- दुग्ध विकास आणि पशु संवर्धन

*हे राज्य मंत्री*

शंभूराज देसाई - गृहराज्यमंत्री(ग्रामीण)
अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास
बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार 
सतेज पाटील - गृह राज्यमंत्री(शहर)
विश्वजित कदम - कृषी आणि सहकार
राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध 
अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री  
दत्ता भरणे - जलसंधारण, सामान्य प्रशासन 
संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे - राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण

Thursday, 1 August 2019

पाव, अर्धा, पाऊण, एक, सव्वा


()एक डझन = १२ वस्तू
()पाऊण डझन = वस्तू
()अर्धा डझन = वस्तू
()पाव डझन = वस्तू
() सव्वा  डझन = १५ वस्तू
() एक हजार = १०००
() पाऊण हजार = ७५०
()अर्धा हजार  =५००
() पाव हजार  = २५०
(१०) सव्वा हजार = १२५०
(११) एक मीटर = १०० सेमी
(१२) पाऊण मीटर = ७५ सेमी
(१३) अर्धा मीटर = ५० सेमी
(१४) पाव मीटर = २५  सेमी
(१५) सव्वा मीटर = १२५ सेमी
(१६) एक किलोमीटर = १००० मीटर
(१७) पाऊण किलोमीटर = ७५०
(१८)अर्धा किलोमीटर = ५०० मीटर
(१९) पाव किलोमीटर = २५० मीटर
(२०) सव्वा किलोमीटर = १२५० मीटर
(२१) एक क्विंटल = १०० कि.ग्रॅ.
(२२) पाऊण क्विंटल = ७५ कि.ग्रॅ.
(२३) अर्धा क्विंटल = ५० कि.ग्रॅ.
(२४) पाव क्विंटल = २५ कि.ग्रॅ.
(२५) सव्वा क्विंटल = १२५ कि. ग्रॅ.
(२६) एक लीटर = १००० मिली
(२७) पाऊण लीटर = ७५० मिली
(२८) अर्धा लीटर = ५०० मिली
(२९) पाव लीटर = २५० मिली
(३०) सव्वा लीटर = १२५० मिली.
(३१) एक मिनिट = ६० सेकंद
(३२) पाऊण मिनिट = ४५ सेकंद
(३३) अर्धा मिनिट = ३० सेकंद
(३४) पाव मिनिट = १५ सेकंद
(३५) सव्वा मिनिट = ७५ सेकंद
(३६) एक तास = ६० मिनिटे
(३७) पाऊण तास = ४५ मिनिटे
(३८) अर्धा तास = ३० मिनिटे
(३९) पाव तास = १५ मिनिटे
(४०) सव्वा तास = ७५ मिनिटे
(४१) एक दिवस = २४ तास
(४२) पाऊण दिवस = १८ दिवस
(४३) अर्धा दिवस = १२ तास
(४४) पाव दिवस = तास
(४५) सव्वा दिवस = ३० तास
(४६) एक वर्षे = १२ महिने
(४७) पाऊण वर्षे = महिने
(४८) अर्धा वर्षे = महिने
(४९) पाव वर्षे = महिने
(५०) सव्वा वर्षे = १५ महिने
(५१) एक शेकडा = १००
(५२) पाऊण शेकडा = ७५
(५३) अर्धा शेकडा = ५०
(५४) पाव शेकडा = २५
(५५) सव्वा शेकडा = १२५