Monday 31 August 2015

श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी यांची सत्यकथा..!

🌺सुंदर बोधकथा🌺
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच न कळाल्याने रस्ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
                                          तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करू लागला

तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे. ’’

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
👉क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते. So be careful and take care.



🌹 Life is very Beautiful 🌹 Good से God तक 🙏

Saturday 22 August 2015

आर्थर अँश हा विम्ब्लडनमधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू..!

"१९८३ मध्ये
त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली.
त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे
त्याला एड्सची लागण झाली.
त्यानंतर
त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ?
या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस
खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक
टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली.
त्यातील फक्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे
अंतिम फेरीत पोचले.
त्या दोन
जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले
नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच
वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?
सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस
बनवते...अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.
            यशस्वी लोक आपल्या
            निर्णयाने जग बदलतात
             आणि अपयशी लोक
            जगाच्या भीतीने आपले
               निर्णय बदलतात...!"

Saturday 15 August 2015

जनरल नालेज...adsir

1. भारतीय संसदीय व्यवस्थेचा _____________ हा केंद्रबिंदू आहे.
उत्तर >> पंतप्रधान

2. महाराष्ट्र शासनाने लोकशाही विकेंद्रीकरण समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमली होती ?
उत्तर >> वसंतराव नाईक

3. खालीलपैकी कोणत्या दिवशी घटना समितीने भारतीय राज्यघटनेला मान्यता दिली ?
उत्तर >> 26 नोव्हेंबर 1949

4. महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पध्दती __________ रोजी सुरू झाली.
उत्तर >> 1 मे 1962

5. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत _________ सभासद संख्या आहे.
उत्तर >> २८८

6. भारतीय संविधानाने एका ___________________ निर्मिती केली आहे.
उत्तर >> प्रबळ संघराज्याची

7. राष्ट्रपती पदाच्या उमदेवाराने वयाची _____ वर्षे पूर्ण केलेली असावीत.
उत्तर >> 35

8. भारतीय राज्य घटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे ?
उत्तर >> जम्मू आणि काश्मीर

9. ग्रामपंचायतीच्या पंचांची निवडणूक ________ पध्दतीने होते.
उत्तर >> प्रौढ मतदान

10. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण हे राज्याचे ___________ कार्य आहे.
उत्तर >> कल्याणकारी

11. वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात ?
उत्तर >> C-14

12. जपानमध्ये आढळलेला मिनामाटा आजार ___________ मुळे झाला.
उत्तर >> पारा (Hg) विषबाधा

13. लोखंडाचा सर्वात शुध्द प्रकार _______ हा आहे.
उत्तर >> रॉट आयर्न

14. खालीलपैकी कोणते धातू नैसर्गिकरीत्या स्वतंत्र व मूळ स्थितीमध्ये आढळतात ?
उत्तर >> Pt,Au

15. गवत-नाकतोडा-बेडूक-साप-गरूड या अन्नसाखळीस काय म्हणतात ?
उत्तर >> गवताळ परिसंस्था

16. स्थिर हवेत तरंगाचे प्रसरण होत असताना पुढीलपैकी कोणती राशी कमी होते ?
उत्तर >> आयाम

17. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो ?
उत्तर >> 76 सेमी | 29.9 इंच | 1013.2 मिलीबार

18. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास भौतिकशास्त्राचे नोबेल परितोषिक मिळाले नाही ?
उत्तर >> जगदीशचंद्र बोस

19. भारताच्या अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन (Nuclear Fuel) भारताच्या समुद्र किनाऱ्यावरच्या मोनाझाईट वाळूत सापडते. या अणुइंधनाचे नाव काय आहे ?
उत्तर >> थोरीयम

20. ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्ट करता येत नाही परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनॅमिक्सचा कोणता नियम आहे ?
उत्तर >> पहिला नियम

Sunday 9 August 2015

काही संक्षिप्त रुपे..competitive exams.करिता

लक्ष्यात ठेवण्याच्या काही SAIMkatta ट्रिक्स:-
=>भारतामधून पश्चिमेकडून पूर्वकडे जाणारे कर्कवृत:-
( गुझाती रामपंछमी )
गु-गुजरात
झा-झारखंड
ती-त्रिपुरा
रा-राजस्थान
म-मध्यप्रदेश
पं-पं बंगाल
छ-छतीसगड
मी-मिझोराम
=>महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ति:-
(मका आबा जे भीम कर)
म -महर्षी कर्वे-1958
का -काणे वामन पांडुरंग-1963
आ-आचार्य विनोबा भावे-1883
बा-बाबासाहेब आंबेडकर-1990
जे-जे आर डी टाटा-1992
भी-भीमसेन जोशी-2000
म-मंगेशकर लता-2001
कर-तेंडूल कर सचिन-2013
=>भारतरत्न पुरस्कार प्राप्त महिला:-
( इंदिरा MASL बनव किंवा इंदिरा MMAL)
इंदिरा-इंदिरा गांधी-1971
M-मदर तेरेसा-1980
A-अरुणा असफअली-1997
S-शुब्बलक्ष्मी एम एस-1998
L-लता मंगेशकर-2001
          किंवा
इंदिरा-इंदिरा गांधी
M-मदर तेरेसा
M-एम एस सुब्बलक्ष्मी
A-अरुणा असफअली
L-लता मंगेशकर
=> G-8 देश
ACF JEJE R   (ACF जेजेआर )
A-अमेरिका
C-कैनडा
F-फ्रांस
J-जर्मनी
E-ईटली
J-जपान
E-इग्लंड
R-रशिया
------------------------------
------
=> G-5 देश
MBBS C
M-मेक्सिको
B-भारत
B-ब्राझील
S-सा.आफ्रिका
C-चीन
------------------------------------
=>G-20 सदस्य देश
AAP MUJE ABCD STR लगे
A = आर्जेन्टीना
A= आस्ट्रेलीया
P = फ्रांस
M = मेक्सिको
U = युरोपीय महासंघ
J = जर्मनी, जपान
E =  इटली, इंडोनेशिया
 A = अमेरिका
B = ब्राझील, ब्रिटन, भारत
C = चीन, कॅनडा  
D = दक्षिण आफ्रिका ,द. कोरिया
 S = सौदी अरेबिया
T = तुर्कस्तान
R = रशिया
------------------------------------
=>सार्क सदस्य देश
MBBS PANI
M-मालदीव
B-भूटान
B-बांग्लादेश
S- श्रीलंका
P-पाकिस्थान
A-अफगानिस्थान
N-नेपाळ
I-इंडिया
------------------------------------
=>पंचायतराज स्वीकारणारे राज्य:-
RAAT KO PUMP
रात को पम्प लाना है.
R-राजस्थान
A-आंधप्रदेश
A-आसाम
T-तामीडनाडू
K-कर्नाटक
O-ओरिसा
P-पंजाब
U-उत्तर प्रदेश
M-महाराष्ट्र
P-प.बंगाल.
------------------------------------
=>विधानपरिषद असलेले सात राज्य...
आज उमक TB न मेला
आ-आंधप्रदेश
ज-जम्मू काश्मीर
उ-उत्तर प्रदेश
म-महाराष्ट
क-कर्नाटक
T-तेलंगाना
B-बिहार
------------------------------------
=>भारताच्या इतर देशाच्या सीमा
बचपन MBA
ब-बांग्लादेश
च-चीन
प-पाकिस्थान
न-नेपाळ
M-म्यानमार
B-भूटान
A-अफगानिस्थान
------------------------------------
=> महाराष्ट्रातील इतर राज्याच्या सीमा
MKG G  AC
मोहनदास करमचंद गांघी गुजरात मध्ये AC त बसत होते.
M-मध्यप्रदेश
K-कर्नाटक
G-गोवा
G- गुजरात
A-आंध्रप्रदेश
C-छतीसगड
------------------------------------
=>सर्वाधिक क्ष्रेत्रफळ असलेले देश
RCC AB AB
R-रशिया
C-कँनडा
C-चीन
A-अमेरिका
B-ब्राझील
A-आस्ट्रेलिया
B-भारत

Saturday 1 August 2015

RTE- 2009 चे 38 कलमे व त्यांचा अर्थ..

  • RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे....
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार..

                                                          धन्यवाद...!