Wednesday 30 December 2015

..चिऊताई दार उघड..

                                                                                             आपल्या मनाविरुद्ध काही झालं कि काही काही व्यक्ती खूप नाराज होतात, स्वतः वर चिडतात, आत्मविश्वास गमवून बसतात. सगळ्या जगाकडे पाठ करून, स्वतःच एकलकोंड असं जग बनवून बसतात.  अश्या लोकांसाठी, एका चिमणीला उद्देशून मंगेश पाडगांवकर यांनी एक छान कविता लिहिली आहे.
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?
वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !
फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !
गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात
कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .
तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .
दार उघड
चिऊताई दार उघड !
सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !
मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?
तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !
प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !
फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,
दार उघड
चिऊताई दार उघड !
निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !
आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .
चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .
तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?
दार उघड
चिऊताई दार उघड !
- मंगेश पाडगावकर

Saturday 26 December 2015

नील आर्मstrong..!

  • नील आर्मस्ट्राँग ...., चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव..
                                          पण, तुम्हा ठाऊक आहे , NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक नाही .... मला ही माहीत नव्हतं !!
                          ती नियोजित व्यक्ति होती, एडविन सी अल्डारिन, अपोलो मिशन चा पायलट ... तो अमेरिकन एअरफोर्स मध्ये कार्यरत होता, त्याला स्पेस वाॅकिंगचा अनुभव पण होता आणि म्हणुनच त्याची या मिशनचा पायलट म्हणुन निवड झालेली होती.
नील आर्मस्ट्राँग हा अमेरिकन नेव्हीमध्ये कार्यरत होता.... त्याची या मिशनचा को-पायलट म्हणुन निवड झालेली होती.
जेव्हा अपोलो यान चंद्रावर उतरले, त्यांना नासाच्या बेस स्टेशन कंट्रोल मधुन आदेश मिळाला , "Pilot First".
पण एडविन थबकला,
"काय होईल पुढे ",
"मी उतरल्या बरोबर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने ओढला जाऊन चंद्रभूमीत गडप तर नाही ना होणार, किंवा बाहेर पडल्या बरोबर जळुन राख ही होऊ शकेल आपली वगैरे वगैरे....."
हा संशयाचा, अडखळण्याचा काळ काही तासांचा नव्हे तर काही क्षणांचा ...

मधल्या काळात NASA ने पुढचा संदेश दिला, "Co-Pilot Next".
क्षणार्धात नील आर्मस्ट्राँग ने आपले पाऊल चान्द्रभूमीवर ठेवले ...!! आणि तो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव झाला ...!!
मानवाच्या विकासाच्या इतिहासाच्या गौरवगाथेचा एक भाग झाला...!!
हा जागतिक इतिहास बदलला एका क्षणात ....
एडविन कडे जरी गुणवत्ता होती... त्याने विशेष नैपुण्य प्राप्त केले असल्यानेच त्याची प्राधान्यक्रमावर निवड झालेली होती ....,
परंतू क्षणभर अडखळल्याने, तो त्या इतिहासाचा भाग होऊ शकला नाही ...!!

जग फक्त त्यालाच ओळखतं ज्यानं प्रथम धाडस केलं ....
हे एक उत्तम उदाहरण आहे, माणुस भितीने, संकोचाने, करु का नको या विचारात संधी कशी गमावतो याचं ....
जेव्हा जेव्हा तुम्ही चंद्राकडे बघाल, तेव्हा हे आठवा ...
क्षणभर अडखळणं आपल्याला एका दैदीप्यमान विजयाचा, इतिहासाचा भाग होण्यापासुन दूर ठेऊ शकतं...!!

आपल्या सर्वांमध्ये काही ना काही उत्तमोत्तम गुणवत्ता आहे, प्रश्न आहे तो फक्त क्षणभर अडखळण्याचा ... घाबरण्याचा ... संकोचाचा ... लाजाळुपणाचा ... तेच आपल्याला अनेकदा त्या यशप्राप्ती पासुन दूर ठेवतं जे मिळविण्यास आपण पात्र असतो ...!!
अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात पण आपण विचारायला घाबरतो, अनेकदा दुसऱ्यांच्या चांगुलपणाला दाद द्यायला चुकतो, आणि कदाचित अनेकजण हा संदेश पुढे पाठविण्यात ही चालढकल करतील ....!!
जर आपण चांगल्या व योग्य गोष्टी करायला चुकलो... अडखळलो... घाबरलो... , तर बहुधा आपण फार मोठी चुक करीत आहोत नाही का ...???

Tuesday 22 December 2015

Only Give 30 minutes to Ourself

  • 30 मिनीट चालण्याचे ३० फायदे...
                                                                      जर आपण सकाळी लवकर ऊठुन ३० मिनीटे घराच्या बाहेर फिरायला जाण्याची तयारी ठेवत असाल तर प्रथम आपले अभिनंदन, कारण आपण दिर्घायुष्यी आहार व आपण आजारी पडण्याचे प्रमाण नगण्य आहे. तर हा लेख नक्कीच वाचा.
                            दररोज ३० मिनीटे चालण्याचे फायदे
१. एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
२. सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
३. कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
४. शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
५. सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
६. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डि जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या ऊनातून मिळते.
७. चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
८. सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
९. चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
१०. चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
११. मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
१२. वजन कमी करण्याचा किंवा वजन संतुलित ठेवण्याचा चालणे हा उत्तम मार्ग आहे
१३. चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
१४. चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
१५. दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
१६. चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
१७. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
१८. नियमित चालण्याची सवय असणारयांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
१९. नियमित चालणारयांची फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
२०. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
२१. नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
२२. हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
२३. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायु मजबुत होतात
२४. मोतीबिंदु ची शक्यता कमी होते.
२५. नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासुन बचाव
२६. नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यासाठी उपयोग.
२७. चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
२८. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
२९. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
३०. चालण्याचा व्यायाम करण्याआड वय मात्र कधीही येत नाही. आपण आपल्य नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.

Friday 18 December 2015

I am proud to be on my "teacher's" job

हाँ मैं शिक्षक हूँ। - हाँ मैं शिक्षक हूँ।
उन डाक्टरो के पीछे ; मैं था ।
उन अर्थशास्त्रीयो के पीछे ; मैं था ।।
उन अंतरिक्ष विज्ञानियो के पीछे ; मैं था ज्ञान का प्रकाश लेकर ।।;
भले ही वे मेरा मजाक उङाये।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।।
मेरे पास महंगा घर नही है ; पर हाँ मैं शिक्षक हूँ ।।।।
कभी कभी मैं उलझ जाता हूँ मेरे अधिकारी और राजनेताओ की बदलती नीतियो में ।
जो बताते हैं कि मुझे कैसे पढ़ाना है ।।।
पर फिर भी मैं शिक्षक हूँ और पढा रहा हूँ।।।
जिस दिन वेतन मिलता है ,मैँ औरो की तरह नही हँस पाता हूँ ।
पर अगले दिन मुझे मुस्कुराके जाना होता है उनके लिये जिन्हे मैं पढ़ाता हूँ ।।
क्योकि मै शिक्षक हँ ।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।
मेरे संतोष का कारण है जब मैं देखता हूँ 
अपने छात्रों को आगे बढते हुए , सफल होते हुए , 
सब कुछ प्राप्त करते हुए , दुनिया का मुकाबला करते हुए।।।
और मैं कहता हूँ गुगल के जमाने में भी मैंनें पढ़ाया है ।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।
कोई बात नहीं वो मुझे किस नजर से देखते हैं ।
कोई बात नहीं वो मुझसे कितना ज्यादा कमाते हैं ।
कोई बात नहीं वो मेरी कितनी इज्जत करते हैं और मानते है।।
वो कारों में घूमते हैं , मैं पैदल चलता हूँ क्योंकि मैं शिक्षक हूँ ।।
हाँ मैं शिक्षक हूँ ।।।  हाँ मैं शिक्षक हूँ ।।।
इसे सभी शिक्षकों के सम्मान मे जन जन तक पहुंचाये ।।।।।।।।

(It's not my created poem. I read it some where; and I like)

Wednesday 25 November 2015

जागतिक दिवस :::

  • जानेवारी
१ जानेवारी : जागतिक वर्षारंभ दिवस.
१२ जानेवारी : राष्ट्रीय युवक दिन.
१५ जानेवारी : राष्ट्रीय सैन्य दिन.
२६ जानेवारी : भारतीय प्रजासत्ताक दिवस.
३० जानेवारी : भारतीय हुतात्मा दिवस (महात्मा गांधी स्मृति दिन).

  • फेब्रुवारी
४ फेब्रुवारी : जागतिक कर्करोग दिवस.
१४ फेब्रुवारी : जागतिक व्हॅलेन्टाइन दिवस.
२० फेब्रुवारी : जागतिक सामाजिक न्याय दिवस.
२१ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२२ फेब्रुवारी : आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस.
२४ फेब्रुवारी : केंद्रीय उत्पादनशुल्क दिन.
२७ फेब्रुवारी : जागतिक नाट्यदिन.
२७ फेब्रुवारी : जागतिक मराठी भाषा दिवस.
२८ फेब्रुवारी : राष्ट्रीय विज्ञान दिवस.

  • मार्च
७ मार्च : जागतिक गणित दिवस.
८ मार्च : आंतरराष्ट्रीय महिला दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२० मार्च : जागतिक चिमणी दिवस.
२१ मार्च : जागतिक जंगल दिवस.
२२ मार्च : जागतिक पाणी दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मार्च : जागतिक हवामान दिवस.
२४ मार्च : जागतिक क्षयरोग दिवस.
३० मार्च : जागतिक डॉक्टर दिवस.

  • एप्रिल
१ एप्रिल : जागतिक मूर्खांचा दिवस.
५ एप्रिल : राष्ट्रीय सागरी दिन.
७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिवस.
११ एप्रिल : जागतिक पार्किन्सन दिवस.
१७ एप्रिल : जागतिक हेमोफिलिया दिवस.
२२ एप्रिल : भारतीय वर्षारंभ दिवस.
२२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन.
२३ एप्रिल : जागतिक प्रताधिकार दिवस(राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२५ एप्रिल : जागतिक मलेरिया दिवस.

  • मे
१ मे : महाराष्ट्र दिवस.
१ मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिवस.
१ मे जागतिक अस्थमा दिवस.
१ मे : जागतिक दमा दिवस.
३ मे : जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
४ मे : आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस.
८ मे : जागतिक रेडक्रॉस दिवस.
९ मे : जागतिक थॅलसीमिया दिवस.
११ मे : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.
१२ मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस.
१५ मे : आंतरराष्ट्रीय कुटुंबपरिवार दिवस.
१७ मे : जागतिक दूरसंचार दिवस.
१९ मे जागतिक कावीळ दिवस.
२२ मे : आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
२३ मे : आंतरराष्ट्रीय कूर्मदिन.
३१ मे : जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन.
मे महिन्यातला पहिला रविवार : जागतिक हास्यदिन.
मे महिन्यातला दुसरा रविवार : आंतरराष्ट्रीय मातृदिन.

  • जून
१ जून : आंतराराष्ट्रीय बालदिन.
५ जून : जागतिक पर्यावरण दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
जूनमधला तिसरा रविवार : पितृदिन (अमेरिका,इंग्लंड, कॅनडा).
१४ जून : जागतिक रक्तदान दिवस.

  • जुलै
१ जुलै : भारतीय डॉक्टर दिवस.
११ जुलै : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन.
२९ जुलै : आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन.

  • ऑगस्ट
९ ऑगस्ट : भारतीय ग्रंथालय दिवस.
९ ऑगस्ट : भारत छोडो दिवस.
१२ ऑगस्ट : भारतीय ग्रंथपाल दिवस.
१४ ऑगस्ट : पाकिस्तानी स्वातंत्र्य दिवस.
१५ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्य दिन.
२० ऑगस्ट : जागतिक मच्छर दिवस.
२९ ऑगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिवस, ध्यानचंद जयंती.

  • सप्टेंबर
५ सप्टेंबर : भारतीय शिक्षक दिवस.
५ सप्टेंबर : भारतीय संस्कृत दिन.
८ सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
जागतिक अल्झेमायर दिवस : सप्टेंबर २१
आंतरराष्ट्रीय शांतता दिवस : सप्टेंबर २१
अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
जागतिक ओझोन संरक्षण दिवस : सप्टेंबर १६
२७ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिवस.
जागतिक प्रथमोपचार दिवस : सप्टेंबर ११
२७ सप्टेंबर : मराठीमाती संकेतस्थळ 

२७ सप्टेंबर २००२ साली सुरू झाले.
आजी-आजोबा दिवस : अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार

  • ऑक्टोबर
२ ऑक्टोबर : जागतिक अहिंसा दिवस, गांधी जयंती. गांधी जयंती मराठी शुभेच्छापत्रे
५ ऑक्टोबर : जागतिक शिक्षक दिन (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
८ ऑक्टोबर : भारतीय वायु दिन.
१० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिवस.
१० ऑक्टोबर : राष्ट्रीय टपाल दिवस.
१६ ऑक्टोबर : जागतिक अन्न दिन.

  • नोव्हेंबर
१२ नोव्हेंबर : जागतिक न्युमोनिया दिवस.
१४ नोव्हेंबर : भारतीय बालदिन, नेहरू जयंती.
१६ नोव्हेंबर : जागतिक सहनशीलता दिवस.

  • डिसेंबर
१ डिसेंबर : जागतिक एड्स दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित).
३ डिसेंबर : जागतिक अपंग दिवस.
७ डिसेंबर : आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक दिवस.n
१८ डिसेंबर : भारतीय अल्पसंख्याक हक्क दिवस.
२३ डिसेंबर : भारतीय किसान दिन.
२३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिवस. जागतिक दिवस :::
                                                                                                            .....नक्की शेअर करा....

Sunday 22 November 2015

मी म्हणत नाही की मी सांगतो तेच करा..

पण विचार करा...
पटले तर कृती करा..
आणि..
मी हे सांगण्यात माझा काही स्वार्थ नाही यामुळे हे विचार जे घेतील ते यशस्वी होतीलच याची मला खात्री आहे. ...
कामयाब लोग " अपने फेसले " से दुनिया बदल देते हे !! और नाकामयाब लोग दुनिया के डर से "अपने फेसले " बदल लेते हे !!"

: बुरा वक्त सब पर आता है,कोई बिखर जाता है_______तो कोई निखर जाता है..
"सफलता कभी भी "पक्की"
नही होती,
तथा
असफलता कभी भी "अंतिम"
नही होती।
इसलिये अपनी कोशिश को
तब तक जारी रखो...
जब तक आपकी,
"जीत" एक "इतिहास" ना बन जाये।"

Saturday 14 November 2015

*वैयक्तिक जीवनात कसे वागावे ......

१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. देव, महामानव, आईवडील इत्यादी

५) नाश्ता , जेवन घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .

१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत

१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर आभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) tv व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा.

Saturday 7 November 2015

आपला छंद नवी ऊर्जा देतो.. - डॉ. रेणू राज


                                          युपीएससी परीक्षा क्रॅक करायची तरअनेकांची तीन-चार वर्ष सहज निघून जातात. काही काहींचे तर अटेम्पट संपतच नाहीत. अनेक जण तर धस्काच घेतात या परीक्षेचा! मित्र-मैत्रिणींची दशा पासून अनेकांची दिशा बदलते. इंजिनिअर, डॉक्टरकीच बरी नको ती परीक्षेची  झंझट असं म्हणतयुपीएससीच्या ‘वाटेला’ अध्र्यावर रामराम ठोकणारेही अनेक. पण युपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात देशात दुसरी आलेली केरळची डॉ. रेणू राज या सर्वापेक्षा थोडी वेगळी आहे.
कल्पना करा ना, पहिलाच अॅटेम्प आणि देशात दुसरी! 
आपल्याला विश्वास ठेवणंही ते अवघड होतं. वय वर्षे फक्त 27.  गाठीशी ‘एमबीबीएस’ची पदवी.  पण समाजातील पिडीतांसाठी काही तरी करण्याच्या ऊर्मीने तिला ‘आयएएस’र्पयत पोहचवलं. त्यासाठी तिनं चिकाटीनं हा किल्ला सर केला. ‘सेल्फ स्टडी’ आणि चिकाटी हेच तिच्या यशाचे खरं गमक. 
हे सारं तर आहेच, पण आणखी काही ठोकताळे तिनं धुडकावून लावलेत. सगळ्यांना असं वाटतं की, उत्तम इंग्रजी येणं, हायफाय क्लासेस लावणं, दिल्ली किंवा पुणंच गाठणं, प्रचंड पैसा ओतणं म्हणजे हे यश. रेणूनं ते तर धुडकावलंच पण तिचं यश खेडय़ापाडय़ातल्या मुलींना हेदेखील सांगतंय की, लगAानंतर आपली स्वपA धुसर होऊ देऊ नका. लगAानंतरही करिअरचं उत्तुंग शिखर गाठता येतं.
केरळ मधल्या एका छोटय़ाशा खेडय़ातल्या बस कंडक्टर असलेल्या वडिलांची ही गुणी मुलगी. तिची आई गृहिणी. जिद्दीनं आधी डॉक्टर झाली, पण मनात स्वपA होतंच आयएएसचं, दरम्यान लगAही झालं. पहिल्याच प्रयत्नात युपीएससीत यश मिळवणं आणि तेही देशात दुस:या क्रमांकावर येणं, ही सहज मिळणारं यश नक्कीच नाही. त्यासाठी अपार कष्ट, जिद्द, चिकाटी लागतेच. डिसेंबर 2क्13 पासून तिनं अभ्यासाला सुरूवात केली. त्यानंतर लगेचच मे महिन्यात तिचं लग्न झालं. मात्र तिनं अभ्यास सुरू ठेवला आणि पहिल्या प्रय}ात देशात दुसरं येण्याचाही विक्रम करुन दाखवला!
रेणू सांगते, 
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
युपीएससीची पुर्व परीक्षा ऑगस्ट महिन्यात तर मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये. नुकतंच लगA झालेलं. लग्नानंतर पुर्व परीक्षेसाठी जेमतेम तीन महिने उरले होते. डॉक्टरच असलेल्या माङया नव:यानंही प्रोत्साहन दिलं. मग मी अभ्यासाला जोमानं लागले. खरं सांगते, तुम्ही दिवसातील 18-2क् तास अभ्यास करून काही होत नाही. 4-5 तासच अभ्यास करा पण मन लावून. मी तेच केलं. अभ्यासासाठी रात्र-रात्र जागले नाही. दिवसभरात चार ते पाच तासच अभ्यास केला. तसं वेळापत्रक तयार केलं जातंच. पण ते वेळापत्रक अगदी काटेकोरपणो पाळणंही आवश्यक नाही. अभ्यासात साचेबध्दपणा येवू दिला नाही. मी अभ्यास करत असताना आपल्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला. घरगुती कार्यक्रम असो किंवा लग्न-समारंभ.. कुटूंबासोबत सहभागी झाले. मित्र-मैत्रिणींना भेटणं, बोलणं सुरूच ठेवलं. अभ्यासाचं कारण पुढं करून ते टाळलं नाही. त्यांच्यासोबत सिनेमे पाहिले, गप्पार मारल्या. अशा गोष्टींमुळं तुमच्यातील उर्जा टिकून राहते. सकारात्मकता येते. त्यातून तुम्हाला जास्त एनर्जी मिळून तुम्ही जास्त फ्रेश होता, असा माझा तरी अनुभव आहे.
त्याला जोड नियमित सरावाची. मी केरळच्या शासकीय कोचिंग इन्स्टिटय़ुटमध्ये परीक्षेची तयारी केली. अभ्यासाची योग्य दिशा मिळण्यासाठी असं फॉर्मल कोचिंग आवश्यक असतंच पण तरी सेल्फ स्टडी महत्वाचा आहे. अभ्यासातून तुम्ही तुमचं मत तयार करणं आणि त्यानुसार लेखी परीक्षा किंवा मुलाखतीत स्वत:ला प्रेङोंट करणंही तितकच महत्वाचं.  कोचिंग घ्यायलाच हवं. मात्र स्वत:चा अभ्यास, स्वत:चं मत, आणि स्वत:ला उत्तम प्रेङोण्ट करणं हे सारं मला जास्त महत्वाचं वाटतं.  हे सारं करताना मला माङया आईनं खूप साथ दिली. माझी आई गृहिणी असली तरी तिनं मल्याळम साहित्यात पदवी संपादन केली आहे. तिला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे मी वाचू लागले. वाचनाबरोबरच लेखनाचीही आवड निर्माण झाली. त्यामुळं ऑप्शनल विषय निवडताना मल्याळम हाच भाषा विषय निवडला. त्याचा परीक्षा देताना खूप फायदा झाला. आपली भाषा ही आपली ताकद आहे, हे अजिबात विसरु नका. 
जे लेखी परीक्षेचं तेच मुलाखतीचं. मुलाखतीवेळी माङयात आणि  मुलाखत घेणा:यांमध्ये खुप चांगला संवाद झाला. ते आपली परीक्षा घेताहेत असं वाटलंच नाही. खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. माझी मुलाखत 3क् ते 4क् मिनिटं चालली. पण तुमची मुलाखत किती वेळ चालतेय, याला महत्व नाही. तुम्ही मुलाखतीदरम्यान स्वत:ला कसं प्रेङोन्ट करता हे महत्वाचं. मला वाटतं, मुलाखतीला पॉङिाटिव्हली सामोरं गेलं तरच आपलं टेन्शन कमी होतं. निगेटिव्ह मानसिकतेनं जर आपण मुलाखत दिली तर काहीच हाशिल नाही. बी पॉङिाटिव्ह हेच खरं सूत्र!
आपण हे का करतोय?
आपण युपीएससी परीक्षा का देतोय? फक्त अधिकारी बनायला का? हा प्रश्न आधी स्वत:ला विचारा!  त्यातून आपलं ध्येय काय हे आपलं आपल्यालाच समजतं. नाहीतर मग नुस्ते दिशाहीन प्रय} करण्यात काही हाशील नाही. मी डॉक्टर होताना हे पाहिलं होतं की देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा खूप ठिकाणी खिळखिळी झालेली आहे. सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा सहजासहजी मिळत नाहीत. देश बदलत असताना आरोग्याच्या क्षेत्रतील बदलही महत्वाचे आहेत. हे बदल करण्यासाठी काम करण्याचं माझं ध्येय आहे. म्हणून मी प्रशासकीय सेवेत दाखल झाले. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींमध्ये बदल करत गेलो तर मोठे बदल दृष्टीक्षेपात येतात. त्यामुळं ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून हे बदल व्हायला हवीत.
हे झालं माझं उदाहरण, पण परीक्षा देणा:या सगळ्यांनाच आपला एक विशिष्ट हेतू तरी किमान माहिती असायला हवा!
आपला छंद नवी ऊर्जा देतो.
मी लहानपणापासूनच नृत्य शिकलेय. त्यामध्ये अनेक बक्षिसंही मिळविली आहेत. युपीएससीची तयार करत असतानाही नृत्याकडे कधीच दुर्लक्ष केलं नाही. जेव्हा इच्छा होईल तेव्हा मनसोक्त नाचाचा रियाज करते. ते कधीच अभ्यासाच्या आड आलं नाही. नृत्य हे माझं  पहिलं प्रेम, तो रियाज मला जी ऊर्जा देतो, तिनं मला कधी अभ्यासाचा थकवा येऊ दिला नाही.

...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

Tuesday 3 November 2015

सार्वजनिक जीवनात कसे वागावे ...

१) तुमचे धेय्य निश्चित करा. मला काय करायचय, काय व्हायचय, कुठे पोहचायच, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे.
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही

6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.

7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.

9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
     १ ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
     २ हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
      ३ हे असच का ?

या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल
******

Saturday 31 October 2015

Feel Happy.... asking you adsir.

Do we know actual full form of some words???  




1). News paper =
North East West South past and present events report.


2). Chess =
Chariot, Horse, Elephant, Soldiers.


3). Cold =
Chronic Obstructive Lung Disease.


4). Joke =
Joy of Kids Entertainment.


5). Aim =
Ambition in Mind.


6). Date =
Day and Time Evolution.


7). Eat =
Energy and Taste.


8). Tea =
Taste and Energy Admitted.


9). Pen =
Power Enriched in Nib.


10). Smile =
Sweet Memories in Lips Expression.


11). Bye =
Be with you Everytime.

 
                                         share these meanings as majority of us don't know these...

Friday 23 October 2015

सतत प्रयत्नांची एक यशस्वी गोष्ट...- निधी गुप्ता


                                                          युपीएससी परीक्षेत देशात तिसरी आलेल्या निधी गुप्ता आपल्या आयुष्याला थोडय़ा वेगळ्य़ा वळणावर नेवून ठेवणारी. स्ट्रेट फॉर्वर्ड विचारांची.  एक व्हिडिओ पाहून तिने प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला. काय असेल असं या व्हिडिओत?
 कोणी आयडॉल की एखाद्याचं प्रेरणादायी भाषण?  
                                                   तर तसं नाही. तो व्हिडीओ होता एका आजारी माणसांचा.  जेव्हा एखादी व्यक्ती आजारपणामुळं अंथरूणावर खिळून राहिलेली असते, तेव्हा तिच्यासमोर आयुष्यातील अनेक घटना येतात. आपण आयुष्यात काय चांगले-वाईट केलं ते दिसायला लागतं,असं त्या व्हिडिओत दाखविण्यात आलं होतं. हा व्हिडिओ पाहून माङयात खुप सकारात्मक बदल झाला. मी आयुष्याची दिशाच बदलण्याचं ठरवलं. लोकांच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी प्रशासनात येण्याचा निश्चय केला असं 27 वर्षांची निधी सांगते, तेव्हा तिच्या डोळ्यात काम करण्याची एक वेगळी तगमग आपल्यालाही सहज दिसते.
निधी सांगते, 
अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला...
                                   मी सॉफ्टवेअर इंजिनिअर. दिल्लीची. आयएएस होण्यासाठी मला पाचवेळा परीक्षा द्यावी लागली. नोकरी करत असतानाच  तयारी सुरू केली. त्यामुळं अभ्यासाला सलग वेळ मिळत नव्हता. त्यामुळे पहिल्या तीन प्रयत्नात यश दुरच राहिलं. पण नंतर गंभीरपणो अभ्यास करण्याचा निर्णय घेतला अन् नोकरी सोडली. त्यामुळं पुढच्याच म्हणजे चौथ्या प्रयत्नात युपीएससी क्रॅक केली. यावेळी ‘आयआरएस’मध्ये संधी मिळाली. ‘कस्टम्स अॅन्ड सेंट्रल एक्साईज विभागात सहाय्यक आयुक्त हे पद मिळालं. पण आयएएस होण्याचं ठरविलं असल्यानं आयआरएसचं प्रशिक्षण सुरू असताना त्याचा अभ्यास सुरू केला. पण नोकरीमुळे दिवसदिवस अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळायचा नाही. तरीही जेवढं शक्य होईल, तेवढा प्रयत्न केला.  जेव्हा अभ्यास केला तेव्हा पूर्ण चित्त एकवटून केला. निराश झाले नाही. त्यामुळंच पाचव्या प्रयत्नात यश मिळालं.  
वेळात वेळ काढून दररोज किमान चार ते पाच तास अभ्यास केला.  परीक्षेसाठी चार प्रयत्न केल्यामुळं अनुभव पाठिशी होताच. त्यामुळे लेखनाचा फारसा प्रयास करावा लागला नाही. पण या परीक्षेत मी टॉपमध्ये येईल अशी काही अपेक्षा नव्हती. होती ती फक्ट कष्ट करण्याची प्रामाणिक इच्छा. प्रशिक्षमामुळं  मुलाखतीचीही तयारी करता आली नाही. पण तिथंही माझा आत्मविश्वास महत्वाचा ठरला. मुलाखत घेणारे जो प्रश्न विचारतील त्याला धीरानं सामोरं जायचं, स्पष्टपणो आपलं म्हणणं मांडायचं, प्रामाणिकपणो उत्तर द्यायची, हे मनात ठरवलं होतं. परीक्षेची तयारी करताना कोचिंग क्लास लावला नाही. फक्त ऑपशनल विषय असलेल्या फिजिक्ससाठी मदत घेतली. सेल्फ स्टडीवरच अधिक भर दिला. अभ्यास करताना ती संकल्पना तुम्हाला समजणं आवश्यक असतं. त्याशिवाय तुम्ही लेखी परीक्षेत ते व्यवस्थित मांडू शकत नाही. जे कराल ते प्रामाणिकपणो करा, हेच यशाचं सूत्र असं मला वाटतं!
ग्लॅमरपेक्षा समाधान महत्वाचं!
                                                  सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करताना पैसा कमविण्याची, परदेशी जाण्याची संधी जास्त मिळाली असती. पण मला भारतात राहून येथील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी काम करायचं आहे. सर्वसामान्य लोकच माझी प्रेरणा आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यातच मला अधिक आनंद मिळेल.  ग्लॅमर, पैसा तर सर्वच क्षेत्रत असतो. पण ज्या गोष्टीतून आंतरिक समाधान मिळेल, ती गोष्ट तुमच्यासाठी ग्लॅमरस असते, असं मला वाटतं. शेवटी आपल्या प्रायॉरिटी आपणच ठरवल्या तर आपले मार्ग आपल्याला सापडतात.
                                        "एक नक्की आपला देश बदलतोय. लोक बदलत आहेत. या बदलाबरोबर लोकांची मानसिकताही बदलायला हवी. इतरांनीच नव्हे तर मुलींनीही स्वत:वर विश्वास ठेवायला हवा की, आपण मोठय़ा पदांवर यशस्वीपणो काम करू शकतो...!"
तो विश्वास हीच आपली ताकद...!

...सदरची माहिती लोकमत Oxigen पुरवणीत वाचण्यात आली. ही माहिती तरुणांसाठी पुन्हा एकदा Blog च्या माध्यमातून जशीच्या-तशी उपलब्ध करून देत आहे. सदर माहितीकरिता लोकमत वृत्तपत्राचे खूप खूप आभार...!

Wednesday 21 October 2015

एक सुंदर प्रार्थना...!

                                             1). कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची खिल्ली  उडवू नका, कारण....
                    काळ इतका ताकदवान आहे की, तो एका सामान्य कोळशालाही  हळू हळू हिरा बनवतो. 

  2). जग नेहमी म्हणतं - चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा....पण भगवांन श्रीकृष्ण म्हणतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही....
  


  • एक सुंदर प्रार्थना.....
     देवा, मला इतकंच सुख दे की,
      मला आयुष्यभरासाठी पुरेल,
    माझी महती इतकीच असू दे की,
       कुणाचं तरी चांगलं होऊ दे,
नात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे की,
   जी फक्त प्रेमाने निभावली जातील,
     डोळ्यात इतकी लाज असूदे की,
   थोरामोठ्यांचा मान राखला जाईल,
आयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की,
कुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल,
    बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव
म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही...!

Thursday 15 October 2015

‘तुम्ही अपंग आहात. तुम्हाला हे काम करता येणार नाही. सफाई कामगार म्हणूनही तुम्ही पात्र ठरणार नाही..’- ईरा सिंघल

  • देशात पहिली आलेली एक जिद्दी मुलगी...

                                                               असं ईराला स्पष्ट सांगण्यात आलं. खरंतर अपार कष्ट करून तिनं 2010 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात यश मिळवत इंडियन रेव्हेन्यू सव्र्हिस (आयआरएस) साठी ती पात्रही ठरली; मात्र तुम्ही अपंग आहात असं कारण सांगत, तिला अकार्यक्षम ठरवून हे पद नाकारण्यात आलं. यामुळं ईरा हादरून गेली. पण तिनं ठरवलंच की, आपण जर हे काम करू शकतो तर हे पद पुन्हा मिळवायचंच. जिद्दीनं तिनं सेंट्रल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल (कॅट)मध्ये अपील केलं. एक नवी लढाईच सुरू केली. ती सोपी नव्हतीच. मणक्याच्या आजारामुळं साडेचार फूट उंची आणि एका हाताने फारसं काम करता न येणा:या ईराला आपण प्रशासकीय सेवेसाठी सक्षम असल्याचे अनेक पुरावे द्यावे लागले. सतत स्वत:ला सिद्ध करावं लागलं. तिच्या जिद्दीपुढं ‘कॅट’नेही मान्य केलं की ईरा सर्वार्थानं प्रशासकीय सेवा करायला सक्षम आहे. ती जिंकली. फेब्रुवारी 2क्14 मध्ये तिची ‘आयआरएस’मध्ये सन्मानपूर्वक निवड करण्यात आली.
    मात्र ती इथंच थांबली नाही. यूपीएससी 2क्14 च्या परीक्षेत ती देशात अव्वल आली. 
    आणि तिनं सिद्ध करून दाखवलं की, मुलगी असणं, थोडं अपंग असणं हे काही आपल्या वाटेतले अडथळे ठरू शकत नाहीत. उलट आपला संघर्ष आणि जिद्द आपल्याला यशाची उंच शिखरं जास्त मेहनतीनं दाखवतात. मूळची दिल्लीची असलेली ईरा, तिनं आधी इंजिनिअर, मग एमबीए केलं. कार्पोरेट सेक्टरमधे उत्तम करिअर सुरू झालं. मात्र तिला प्रशासकीय सेवेतच काम करायचं होतं. तिचं मन त्या कार्पोरेट वातावरणात रमत नव्हतं. म्हणून मग परीक्षेची तयारी करण्यासाठी तिनं उत्तम पगाराची, करिअर घडू शकणारी नोकरी सोडली. 
    आणि प्रशासकीय सेवेत येण्याची तयारी सुरू झाली. पण तिच्या वाटेवर अडथळेच अनंत होते.
    परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरही तिला झगडावं लागलं, ते तर ती झगडलीच; पण त्याहून पुढचं पाऊल टाकत देशात अव्वल ठरली.
    ईरा सांगते, 
    अभ्यासाचा तिचा फॉम्यरुला
    या परीक्षेच्या तयारीचा आणि हमखास यशाचा असा काही एकच एक फॉम्यरुला नसतो. यूपीएससीची तयारी सुरू करताना आपल्या क्षमतांचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही किती खोलवर अभ्यास करताय यावरच यश अवलंबून असतं. 
     ‘मी कधीच अभ्यासाचं वेळापत्रक केलं नाही. पण सुरुवातीला खूप अभ्यास केला. ‘आयएएस’साठी चार परीक्षा दिल्या. पण त्यासाठी कोचिंग इन्स्टिटय़ूटमध्ये गेले नाही. स्वत:च अभ्यास केला. पण तो करत असताना परीक्षेत चांगले गुण मिळायलाच हवेत असा हट्ट केला नाही. प्रत्येक प्रयत्नात झालेल्या चुका मात्र सुधारत गेले. आपलं आपल्याला कळतंच ना, नेमकं काय चुकलं. ते पुढच्या अॅटम्पला सुधारलं. सुरुवातीच्या काळात उत्तरं लिहिताना मला जेवढं येतंय तेवढं सगळं मी उतरवत जायचे. लिहून काढायचे. पण असं करताना उत्तरपत्रिका तपासणा:या परीक्षकांना काय हवं आहे, याचा विचारच मी केला नाही. मात्र नंतर नंतर आपलं काही तरी चुकतंय असं वाटलं. विचार केला आणि लेखनाचा पॅटर्नच बदलून टाकला. हाच निर्णय मला इथर्पयत घेऊन आला. लेखी परीक्षा देताना परीक्षकांना उत्तर म्हणून काय हवं आहे याचा विचार करून मी उत्तरं लिहायला लागले. मी आता सगळ्यांना एकच सांगते की, आपल्याला काय आणि किती येतं हे दाखवण्यापेक्षा परीक्षकांना अपेक्षित असलेली उत्तरं लिहायला हवीत. आणि दुसरं म्हणजे वेळ मारून न्यायची सवय असेल तर ती सोडून द्या. आपले पेपर तपासणारे परीक्षक आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. त्यामुळं त्यांना मूर्ख बनविणारी उत्तरं लिहून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेऊ नका!
    मला स्वत:ला मुलाखतीमध्ये कमी गुण आहेत. पण लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी केल्यानं मला पहिला क्रमांक मिळाला. लेखन हे माझं मुख्य अस्त्र ठरलं. तोच सराव मी करत होते. शिकवण्या लावून हे सारं होत नाही. स्वत:चं स्वत:च जास्तीत जास्त काम करायला हवं. लेखी परीक्षाच काय पण मुलाखतीसाठीही मी वेगळं मार्गदर्शन घेतलेलं नाही. अनेकजण या परीक्षेचं टेन्शन घेतात. का घ्यायचं टेन्शन? मुलाखत घेणारे प्रश्न विचारणारच. तुम्ही त्यांच्यासमोर कसं प्रेङोंट होता हे महत्त्वाचं. मी मुलाखतीला आत्मविश्वासानं सामोरे गेले. जेव्हा मी अभ्यास करत होते, परीक्षा देत होते तेव्हा मी गुणांचा विचारच केला नाही. समोर बसलेल्या लोकांना आपल्यातील आत्मविश्वास दिसायला हवा हे महत्त्वाचं!
    तो असेल तर मग कुठलीच परीक्षा तुम्हाला नापास करू शकत नाही.
    नो मॅटर, हु यू आर!
    मी कधीच स्वत:ची तुलना इतरांशी केली नाही. आपल्या अपंगत्वाचाही कधी विचार केला नाही. आपली कमजोरी न समजता जिद्दीनं तयारी केली. इतरांशी तुलना केली की तुम्हाला नैराश्य येतं. हे नैराश्यच तुमच्यातील आत्मविश्वास कमी करतं. परीक्षेला सामोरं जातानाही कधीच कसली अपेक्षा ठेवली नाही की कुठल्या गोष्टीला अतिआत्मविश्वासाने सामोरं गेले नाही. कधी नकारात्मक विचारही केला नाही. होतं काय की, अजूनही आपल्याकडे लोकांना वाटत नाही की महिला बडय़ा पदावरच्या जबाबदा:या पेलू शकतात. ते पुरुषांचंच काम असा एक समज. त्यात अपंगांना कमी लेखण्याची वृत्ती आहेच. त्यात शारीरिकदृष्टय़ा तुम्ही वेगळे दिसत असाल तर भेदाभेद आणखी वाढतो. या सा:याचा सामना केल्यावर मला वाटतं की, सगळ्यांनाच समान संधी मिळाली पाहिजे. आणि दुसरे ती संधी देत नसतील तर आपण स्वत:ला अशी संधी द्यायलाच हवी. आपण कुणाशीही स्वत:ची तुलना न करता, पूर्ण ताकदीनं आपली मेहनत करायची. अपमानानानं दुखावलं जाणं वेगळं, पण त्यातून तुमची लढण्याची जिद्द वाढली पाहिजे. कमी होता कामा नये!
    एक काम की बात
    यूपीएससीची तयारी करताना त्यावरच सर्वस्वी अवलंबून मात्र राहू नये असं मला वाटतं. हा प्रवास इतका सोपा नाही. त्यात वय वाढतं, पैसे कमावण्याचं प्रेशर वाढतं. म्हणून मग आपली डिग्री असेल त्या विषयात किमान एक-दोन र्वष तरी नोकरी करायला हवी. त्यातून खूप अनुभव मिळतात. त्याचा उपयोग खूप होतो. एकतर एका प्रयत्नात तुम्हाला यश येईलच असं नाही. आणि दुसरं म्हणजे हाताशी पैसा असल्यानं आत्मविश्वास कमी होत नाही. त्यामुळे मी फुलटाइम अभ्यासच करीन असं म्हणण्यापेक्षा थोडा अनुभव, थोडा पैसा त्यापूर्वी गाठीशी बांधलेला बरा!