Tuesday, 12 July 2016

Balance info by miscall

                                                   सभी बैंक ने यह सुविधा शुरू की है… आपको अपने बैंक खाते के साथ रजिस्टर्ड मोबाइल नंबर से अपने बैंक के निचे दिए गए मोबाइल नंबर पर कॉल करनी है कॉल अपने आप कट जाएगी और आपके बैंक बैलेंस की जानकारी आपके फ़ोन पर SMS में आ जाएगी | अब आपको अपने बैंक बैलेंस जानने के लिए अपने ATM की ट्रानसेक्शन को व्यर्थ करने की जरुरत नहीं है...!
1. Axis Bank – 09225892258
2. Andhra Bank – 09223011300
3. Allahabad Bank – 09224150150
4. Bank of Baroda – 09223011311
5. Bhartiya Mahila Bank – 09212438888
6. Dhanlaxmi Bank – 08067747700
7. IDBI Bank – 09212993399
8. Kotak Mahindra Bank – 18002740110
9. Syndicate Bank – 09664552255
10. Punjab National Bank -18001802222
11. ICICI Bank – 02230256767
12. HDFC Bank – 18002703333
13. Bank of India – 02233598548
14. Canara Bank – 09289292892
15. Central Bank of India – 09222250000
16. Karnataka Bank – 18004251445
17. Indian Bank – 09289592895
18. State Bank of India – Get the balance via IVR
1800112211 and 18004253800
19. Union Bank of India – 09223009292
20. UCO Bank – 09278792787
21. Vijaya Bank – 18002665555
22. Yes Bank – 09840909000
23. South Indian Bank-0922300848
24. Bank of Maharashtra-9222281818

Friday, 1 July 2016

💝 गणित रोमन अंक 💘



Roman Numerals, Roman numerals List, Number Roman numeral
0 not defined
1 I
2 II
3 III
4 IV
5 V
6 VI
7 VII
8 VIII
9 IX
10 X
11 XI
12 XII
13 XIII
14 XIV
15 XV
16 XVI
17 XVII
18 XVIII
19 XIX
20 XX
21 XXI
22 XXII
23 XXIII
24 XXIV
25 XXV
26 XXVI
27 XXVII
28 XXVIII
29 XXIX
30 XXX
31 XXXI
32 XXXII
33 XXXIII
34 XXXIV
35 XXXV
36 XXXVI
37 XXXVII
38 XXXVIII
39 XXXIX
40 XL
41 XLI
42 XLII
43 XLIII
44 XLIV
45 XLV
46 XLVI
47 XLVII
48 XLVIII
49 XLIX
50 L
51 LI
52 LII
53 LIII
54 LIV
55 LV
56 LVI
57 LVII
58 LVIII
59 LIX
60 LX
61 LXI
62 LXII
63 LXIII
64 LXIV
65 LXV
66 LXVI
67 LXVII
68 LXVIII
69 LXIX
70 LXX
71 LXXI
72 LXXII
73 LXXIII
74 LXXIV
75 LXXV
76 LXXVI
77 LXXVII
78 LXXVIII
79 LXXIX
80 LXXX
81 LXXXI
82 LXXXII
83 LXXXIII
84 LXXXIV
85 LXXXV
86 LXXXVI
87 LXXXVII
88 LXXXVIII
89 LXXXIX
90 XC
91 XCI
92 XCII
93 XCIII
94 XCIV
95 XCV
96 XCVI
97 XCVII
98 XCVIII
99 XCIX
100 C
200 CC
300 CCC
400 CD
500 D
600 DC
700 DCC
800 DCCC
900 CM
1000 M
5000 V
10000 X
50000 L
100000 C
500000 D
1000000 M
Years in roman numerals
Year Roman numeral
1000 M
1100 MC
1200 MCC
1300 MCCC
1400 MCD
1500 MD
1600 MDC
1700 MDCC
1800 MDCCC
1900 MCM
1990 MCMXC
1991 MCMXCI
1992 MCMXCII
1993 MCMXCIII
1994 MCMXCIV
1995 MCMXCV
1996 MCMXCVI
1997 MCMXCVII
1998 MCMXCVIII
1999 MCMXCIX
2000 MM
2001 MMI
2002 MMII
2003 MMIII
2004 MMIV
2005 MMV
2006 MMVI
2007 MMVII
2008 MMVIII
2009 MMIX
2010 MMX
2011 MMXI
2012 MMXII
2013 MMXIII
2014 MMXIV
2015 MMXV
2016 MMXVI
2017 MMXVII
2018 MMXVIII
2019 MMXIX
2020 MMXX

Monday, 27 June 2016

एक चित्रकार होता...

एक चित्रकार होता.
गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता.
गुरू व स्वत:च्या  कलेवर त्याला प्रचंड विश्‍वास होता.

पण स्वत:वर त्याचा विश्‍वास फारसा नसावा.
तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’
हा प्रश्‍न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला.

एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली,
मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले?
यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’

लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला.
संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला,
‘मी हरलो.
मी खूप वाईट चित्रकार आहे.
मी चित्रकला सोडायला हवी.
मी संपलो.’

हे ऐकून गुरूने म्हटले,
‘तू व्यर्थ नाहीस.
तू फार चांगला चित्रकार आहेस.
मी ते सिद्ध करू शकतो.
असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये.

तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली,
‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले.

संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता.
सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले.

यावर गुरू म्हणाले,
‘फुल्ल्या मारणे सोपे असते,
पण दुरुस्ती करणे कठीण असते.’

दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका.
सगळ्यांची मतं ऐका,

पण इतरांच्या मतांनी तुटू नका.
मी कोण आणि कसा
हे पहिल्यांदा स्वत:ला विचारा...

आपला आत्मविश्वास सगळयात महत्वाचा...                                                          ( संकलित )

Friday, 17 June 2016

पाणी बचतीचा महत्वाचा उपाय...

                                    पावसाळा ऋतु सुरु झाला तरी सध्या महाराष्ट्र आणि भारतातील काही भागात भीषण पाणी टंचाई ( दुष्काळ परिस्थिती ) जाणवत आहे. त्या संदर्भात आपणास काही उपाययोजना करता येईल याबाबतची महत्वाची माहिती......

इस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व.
      पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत इस्राईलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे.

                  इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये उत्पन्न मिळवितो.
      पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
        सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादन चौपट वाढ झाली आहे.
            इस्राईलमध्ये पावसाचे पाणी भूगर्भात साठविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते.
या साठविलेल्या पाण्यातून देशाची 60 टक्के पाण्याची गरज भागविली जाते.
इस्राईलमध्ये भूगर्भातील पाणीसाठ्याची दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत.
            यामध्ये समुद्र किनाऱ्याजवळील झरे (ऍक्विफर) आणि दुसरा पर्वतीय विभागातील झऱ्यातून पाणीसाठा तयार केला जातो.
           याशिवाय उत्तरेकडील गोलन टेकड्या व पश्‍चिमेकडील किनरेट तळ्याजवळ लहान शेकडो झरे आहेत.
                समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून दरवर्षी सुमारे 25 कोटी घनमीटर व पर्वतीय विभागातील झऱ्यातून सुमारे 35 कोटी घनमीटर पाणी उचलले जाते.
                समुद्रकिनाऱ्याजवळील झऱ्यातून प्रमाणापेक्षा जास्त पाणी उचलल्यास गोड्या पाण्याची पातळी खाली जाते.
    त्यामुळे ऍक्विफरमध्ये खारे पाणी मिसळून क्षाराचे प्रमाण वाढते. पाणी वापरण्यायोग्य राहत नाही.
        झऱ्याच्या साठ्यातून उचललेल्या जादा पाण्याची योग्य पातळी राहावी म्हणून किनरेट तलावात पावसाळ्यात जादा झालेले पाणी बंदिस्त पाइपमधून झऱ्यांच्या साठ्यात सोडले जाते.
           अवर्षणाच्या वेळी जादा उचलले पाणी पावसाळ्यात पुनःश्‍च त्या पातळीवर आणणारा इस्राईल हा जगातील एकमेव देश आहे.
   या दोन झऱ्याशिवाय इस्राईलमध्ये भूपृष्ठात पाणीसाठा करण्यासाठी सुमारे 2800 विहिरी असून 150 कूपनलिका आहेत.
            यामधील काही विहिरी व बोअरवेल्स खास अवर्षणाच्या वेळी उचललेल्या पाण्याचे हिवाळ्यात पुनर्भरण (रिचार्ज ऑफ वॉटर) करण्यासाठी ठेवल्या आहेत.
याशिवाय भूपृष्ठावरील पावसाळ्यात वाहणारे पाणी वाया जाऊ नये म्हणून लहान लहान तळी व तलावांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे.
      इस्राईलमध्ये हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात पाऊस पडतो.
2) किनरेट तलाव (सी ऑफ गॅलीली)
        इस्राईलमधील गोड्या पाण्याचा एकमेव आणि मोठा तलाव जॉर्डन नदीवर नैसर्गिक खच दरीतून निर्माण झाला आहे.
    हा तलाव नैसर्गिकरीत्या खचलेल्या भागात म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा 740 फूट खोलीवर असल्याने जॉर्डन नदीचे पाणी येथे मोठा बंधारा न बांधता साठून राहते.
          या तलावाची एकूण क्षमता 400 कोटी घनमीटर असून, या तलावातून दरवर्षी 50 कोटी म्हणजे देशाच्या एकूण गरजेच्या 25 टक्के पाणी वापरासाठी घेतले जाते.
            इस्राईलला वार्षिक सुमारे 200 कोटी घनमीटर पाणी लागते.
             तलावाचा संपूर्ण साठा वापरावयाचा झाल्यास या तलावाचे पाणी इस्राईलला दोन वर्षं पुरेल.
    तथापि, बाष्पीभवनाने वाया जाणारे पाणी, तसेच पुढील वर्षी कदाचित पाऊस पडला नाही तर दुष्काळ विचारात घेऊन ते एकूण क्षमतेच्या 25 टक्के पाणी वापरले जाते.
      सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी 50 कोटी घनमीटर पाणी उचलून 350 कोटी घनमीटर पाण्याची पातळी कायम ठेवली जाते.
         किनरेट तलाव इस्राईलमधील पाण्याचा राखीव साठा आहे.
          तलावातील मर्यादित पाणी पुरवून कसे वापरावे याचे किनरेट तलाव उत्तम उदाहरण आहे.
           या तलावाची लांबी 21 किलो मीटर व रुंदी आठ किलोमीटर आहे.
     पुनर्वापरात आणलेल्या पाण्यातून घरगुती वापर व उद्योगधंद्यांसाठी पाण्यावर सुमारे 70 टक्के प्रक्रिया करून शेतीच्या वापरासाठी दिले जाते.
           त्यामुळे देशाची एकूण 15 टक्के गरज भागविली जाते.
      इस्राईलमध्ये पुरवठा केलेल्या पाण्यापैकी 60 टक्के पाणी शेतीसाठी, दहा टक्के पाणी उद्योगधंद्यासाठी व 30 टक्के पाणी घरगुती वापरासाठी दिले जाते.
                    शेतीसाठी कराव्या लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पाणीपुरवठा कंपनीस 1000 लिटर पाण्यास दहा रुपये इतका खर्च येतो.
शेतकऱ्यांना शेतीसाठी द्यावयाच्या पाण्यास सरकारमार्फत 50 टक्के अनुदान दिले जाते.
                  इस्राईलचा शेतकरी 1000 लिटर पाण्यापासून 70 रुपये मिळवितो. पूर्वी त्यांना 1000 लिटर पाणी वापरातून 18 रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनात चौपट वाढ झाली आहे.
     आपल्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने या गणिताचा जरूर विचार करावा.
इस्राईलमध्ये शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा पीक पद्धतीनुसार कोटा ठरवून दिला जातो.
    ठरवून दिलेल्या कोट्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा करणे त्यास बंधनकारक आहे.
    तथापि, ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जादा पाणी हवे असल्यास शासनाकडे तशी मागणी करावी लागते.
         शासन पाण्याच्या आवश्‍यकतेची खात्री करून नेहमीपेक्षा दुप्पट दराने पाणीपुरवठा करते.
             पाण्याच्या अशा प्रकारे प्रचंड मर्यादा असल्याने प्रत्येक शेतकऱ्याने नियोजनबद्ध रीतीने ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा पीक प्रकारानुसार 100 टक्के वापर केलेला आहे.
          प्रत्येक शेतकऱ्याने आवश्‍यक शेतावर पाणीपुरवठ्यासाठी स्वयंचलित संगणक बसविला आहे.
   
    त्यामुळे शेतीस आवश्‍यक तेवढे पाणी दिले जाते. या देशात पाटाने अजिबात पाणी दिले जात नाही. पण पाणी निश्‍चितपणे पाहिजे त्या वेळी मिळते.

              नाहीतर आपणाकडे पाण्याची पाळी 15 दिवसांपासून एक महिन्यापर्यंत कशीही लांबते.
   याचा परिणाम प्रति एकरी उत्पन्नावर होतो.
फिल्टरचे तंत्रज्ञान :-

             ठिबक सिंचन पद्धतीमध्ये फिल्टरला अतिशय महत्त्व आहे.
             ठिबक संच बसविण्यापूर्वी पाण्याची गुणवत्ता व दर्जा कोणत्या प्रकारचा आहे हे विचारात घ्यावे लागते.
           इस्राईलमध्ये फिल्टरेशन तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे.
त्यासाठी त्यांनी दर्जेदार, टिकावू व कार्यक्षम फिल्टर तयार केले आहेत.
    पाणी कितीही प्रदूषित असले तरी अतिशय वेगाने ते फिल्टरमध्ये आत घेतले जाते.
            आतील जाड चकत्या वेगाने फिरतात त्यामुळे स्वच्छ पाणी खाली पाइपमध्ये येते व पाण्यातील घाण फेसासारखी वरच्या भागात साठविली जाते व ठराविक वेळेला विरुद्ध दिशेकडून पाण्याचा प्रवाह येऊन घाण व्हॉल्व्हद्वारे बाहेर टाकली जाते व फिल्टर आपोआप साफ केला जातो.
ड्रीपरचा वापर :-
           इस्राईलमध्ये ठिबक संच तयार करता असताना तो सहज, सुलभ वापरायोग्य व कमीत कमी देखभाल लागेल असे तयार केले जातात.
                  पाइपच्या बाहेर ड्रीपर असल्यास ते पाइप शेतात अंथरताना किंवा काढताना मोडण्याची, तुटण्याची शक्‍यता असते.
कारण इस्राईलमध्ये पाइप टाकणे किंवा परत गोळा करणे ही कामे यंत्रामार्फतच केली जातात.
         याकरिता त्यांनी इनलाईन ड्रीपर पद्धती शोधून काढली आहे.
      इस्रायली कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ड्रीपरची निर्मिती केली असून पाणी देणे बंद केल्याबरोबर ड्रीपरमधून पाणी बाहेर पडण्याचे थांबते.
        त्यामुळे पाइपमधीलही पाणी वाया जात नाही किंवा पिकास जास्त दिले जात नाही.

     या तंत्रामुळे पाण्याची लक्षणीय बचत होते कारण ग्रीन हाऊसमध्ये पिके वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घेतली जातात.
         पिकाच्या योग्य वाढीकरिता दिवसातून बऱ्याच वेळेला पाण्याचा वापर केला जातो.
    काही कंपन्यांनी एका वेळी 18 x 18 मीटर एवढ्या अंतरावरील पिकांना पाणी देता येईल असे तुषार संच बनविलेले आहेत.
            ठिबक सिंचनातून इस्राईलने अतिशय नेत्रदीपक प्रगती केलेली आहे.
   हजारो एकर फळबागा, फुलशेती, स्ट्रॉबेरीची शेती, ठिबक सिंचनावर डोलताना बहरताना दिसून आल्या.
     एवढेच काय त्यांनी रस्त्यावरील झाडांना, विमानतळावरील हॉटेलसमोरील लहान लहान झाडांनासुद्धा ठिबकनेच पाणी दिले आहे.
  याउलट आपण ठिबक सिंचनामध्ये म्हणावी तशी प्रगती करू शकलो नाही.
कारण आपल्याकडील शेतकऱ्यांना अद्यापही ठिबक पाणी पद्धतीचे महत्त्व पटलेले नाही.
    पाणी व्यवस्थापनाच्या फवारा पद्धतीमध्ये कायम स्वरूपी फवारा, फिरता फवारा, गन फवारा, गन फवारा, कमी दाबाचा फवारा, वैयक्तिक झाडापुरता छोटा फवारा, एका विशिष्ट दिशेने फिरणारा फवारा असे वेगवेगळे प्रकार असून एका वेळी 160 एकरांपर्यंत गोलाकार क्षेत्र फिरून भिजविणारा फवारा सिंचन हे येथील खास वैशिष्ट्य आहे.
         मुख्य पाइपवर बसविलेल्या तोट्यांच्या साह्याने पाणी सभोवार पिकावर फवारले जाते.
            हा फवारा संच शेतात कायमस्वरूपी बसविलेला असतो.
    मोटारच्या किंवा ट्रॅक्‍टरच्या साह्याने हा संच मागे पुढे पाहिजे त्या प्रमाणे हलविता येतो.

       सदरचा संच एका बाजूला स्थिर ठेवलेला असतो व दुसरी बाजू गोलाकार फिरून शेतामधील पिकास फवारा पद्धतीने पाणी दिले जाते.
आपल्या राज्यात पाण्याच्या नियोजनाबाबत भरपूर करता येणे शक्‍य आहे.
     इस्राईलच्या गोलन टेकड्या व उत्तरेकडील वातावरण आपल्या महाराष्ट्रातील कोकण विभाग, थंड हवेची ठिकाणे व डोंगरी भागातील वातावरणाशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे.
    इस्राईलमध्ये उत्तरेकडे पाऊस 700 मि.मी. तर आपल्या या भागात 3000 ते 4000 मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो.
     असे असूनही पावसाळ्यात जास्त पाऊस पडणाऱ्या या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासते.
  राज्यातील दुष्काळसदृश तालुक्‍यात वार्षिक 500 ते 600 मि.मी. एवढा पाऊस पडतो.
              याउलट इस्राईलमध्ये जास्त पाऊस पडणाऱ्या विभागात 600 ते 700 मि.मी. पाऊस पडत असूनही केवळ पाणी अडविण्याच्या व जिरविण्याच्या प्रभावी मोहिमेमुळे व पाण्याच्या नियोजनामुळे वर्षभर देशास पाणीपुरवठा करणे त्यांना शक्‍य झाले आहे.
संगणक नियंत्रित
ठिबक आणि फवारा सिंचन :--

     इस्राईलमध्ये सिंचन पद्धतीबाबत अतिशय सखोल अभ्यास करून संगणक नियंत्रित ठिबक व फवारा सिंचन पद्धतीचा वापर सुरू केला आहे.
               सिंचन व्यवस्थेकरिता इस्राईलच्या शास्त्रज्ञांनी प्रत्येक झाडाचे वैशिष्ट्य शोधून काढले आहे.
त्याच्या वयोमानाप्रमाणे तसेच जमिनीची प्रत, हवामान या सर्व बाबींचा बाराकाव्याने अभ्यास करून त्या झाडास पाणी किती व कधी लागेल त्या सर्व बाबी ठरविण्यात आल्या.
त्याची सर्व माहिती संगणकास पुरवून ठिबक सिंचनाचा संच संगणकास जोडला जातो.
    या संगणकाद्वारे पिकास आवश्‍यक तेवढेच व आवश्‍यक वेळी पाणी दिले जाते.
   ठिबक सिंचनाचा वापर करताना पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या जाडीचाही त्यांनी विचार केला आहे.
    एखाद्या झाडास साधारणपणे आठ तासात किती पाणी लागते, त्यासाठी किती जाडीचा थेंब व किती वेगाने तो ड्रीपरमधून बाहेर पडावा अशा प्रकारचे त्या ड्रीपरला छिद्र पाडली जातात.
            ठिबक सिंचन पद्धतीद्वारे द्रवरूप खते झाडाच्या मुळाजवळच दिली जातात.
        त्यामुळे खतांचा अपव्यय टाळून त्यांचा योग्य मोबदला मिळतो.
       रिमोट कंट्रोल बसविलेले संगणक हे काम माणसापेक्षा अतिशय बिनचूक व चांगल्या पद्धतीने करत असल्यामुळे संगणकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या काही संस्था इस्राईलमध्ये निर्माण झाल्या आहेत.
संगणक वापराचे फायदे :--
1) संगणक नियंत्रित पद्धतीत पिकांना पाणीपुरवठा दररोज ठराविक वेळेला व ठराविक कालावधीसाठी पिकाचे त्या दिवशीच्या आवश्‍यकतेनुसार केला जातो.  
                     त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीस मदत होते.
2) संगणक पिकांना नियमित व अखंडपणे पाणीपुरवठा करत असताना आवश्‍यकतेनुसार व्हॉल्व्ह (झडपा) बंद व चालू करणे इ. कामे करतो.
           पिकाचा प्रकार, मातीचे गुणधर्म व त्या दिवशीचे असणारे हवामान, पाण्याची गळती, पाणी वाहण्याची गती, वीजपुरवठा या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवून आवश्‍यक तेवढेच पाणी देतो.
3) संगणकामुळे खते योग्य प्रमाणात व योग्य वेळी दिली जाऊन त्यांची कार्यक्षमता वाढविता येते.
                 पाणी व खते एकाचवेळी दिल्यास पिकास आवश्‍यक अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळतात.
             पाण्यातून खते देता यावीत यासाठी इस्राईलमध्ये सर्व प्रकारची खते द्रवरूप तयार केली जातात.
4) काही तांत्रिक दोषामुळे जास्त दाबाने पाणी आल्यास व त्यामुळे काही ठिकाणी पाइप फुटून पाणी वाहू लागल्यास संगणकाद्वारे त्या ठिकाणचे व्हॉल्व लगेच बंद केले जातात.
त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत नाही.

Tuesday, 10 May 2016

..पॉवर ऑफ चॉइस..

" मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’
‘मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षीतपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’
मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती.
वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ’ कॉफी आहे!’
मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’
‘काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’
‘मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेर्याावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.
माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’
माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’
मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टाक्सी सुरु करातताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’
वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहीती दिली.
‘आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही’ वासु म्हणाला.
‘मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’
वासुच्या चेहेर्याेवर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस’ बद्दल कळले!’
‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले
‘पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक’ करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणार्याी सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले’ वासु म्हणाला
‘आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजुबाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.
‘मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.
‘झाला तर!’ वासु उत्साहाने सांगु लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले. या वर्षी कदाचीत माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’
गरुड व्हा, बगळा होऊ नका!
वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!
आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का?
तुम्हाला काय वाटते? "

                                                                                                      (सुप्रसिद्ध साहित्यीक चेतन भगत याने सांगीतलेला हा किस्सा आहे.)

Saturday, 30 April 2016

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे..

1 तारे जमीन पर
2 एलिझाबेथ एकादशी
3 प्रकाश बाबा आमटे
4 टपाल
5 श्वास
6 कराटे किड
7 कुंग फ़ू पांडा
8 राजमाता जिजाऊ
9 रमाबाई भिमराव आंबेडकर
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
11 भाग मिल्खा भाग
12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय
14 होम
15 यलो
16 चिलर पार्टी
17 द किड
18 होम अलोन
19 तानी
20 सिंड्रेला
21 बेबीज डे आऊट
22 ज जंतरम म मंतरम
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
25 वनपुरुष
26 दहावी फ़
27 बभागो भूत आया
28 Two sollutions
29 twenty thousand leagues
30 under the sea
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया
33 शाळा
34 राजुचाचा
35 किंग अंकल
36 दोस्ती (हिंदी)
40 3 इडियटस
41 चल चले
42 चकोरी
43 चिंटू
44 चिंगी
45 I am Kalam
46 Park
47 graviti
48 jurasic world
49 सिंधूताई सपकाळ
50 castaway 51 भगतसिंग
52 चिमनी पाखरं
53 the berning train
54 Harry potter 55 mountain man
56 शिक्षणाच्या आईचा..
57 लोकमान्य
58 विटी दांडू
59 आक्टोबर स्काय
60 मासूम
61 क्रिश
62 एक डाव भुताचा,
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away - Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro - Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age - 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free
81 Inside out
82 Madagascar
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six,
92 rio
93 Karate kid
94 Home alone....
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi,
100 blue umbrella,
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug's Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies.
A few more movies -
Charly Chaplin's movies - especially The Kid, The Circus, Gold Rush.
Majid Majidi's - Children of Heven, Father, Barn.
Old Hollywoodc Movies - Jungle Book, I'm for the Hippopotamus, The Mad Mad World, Beautiful People.

Monday, 18 April 2016

Types of doctors

15 Types of doctors:
1. Dermatologist = skin specialist (त्वचा विशेषज्ञ)
2. Cardiologist = heart specialist (हृदय रोग विशेषज्ञ)
3. Gynecologist/Gynaecologist = female disease specialist (स्त्री रोग विशेषज्ञ)
4. Dentist = doctor of teeth & jaw bones (दांत और जबड़े की हड्डियों के डॉक्टर)
5. Ophthalmologist = eye specialist (नेत्र-विशेषज्ञ)
6. Orthopedist = Muscle and bones expert (मांसपेशियों और हड्डियों का विशेषज्ञ)
7. Anesthesiologist = a specialist who administers an anesthetic to a patient before he is treated
(वह विशेषज्ञ जो चेतना शून्य करने वाली औषधि का बंदोबस्त करता है)
8. Endocrinologist (अन्त:स्त्रावविज्ञानी) =  diagnoses and treats diabetes, hormone imbalances, thyroid disease and other disorders of the endocrine system.
9. Gastroenterologist =  specializes in diseases of the digestive system.
10. Hematologist (रुधिर रोग विशेषज्ञ) = a hematologist specializes in diseases of the blood and bone marrow.
11. Hepatologist = specializes in diseases of the liver.
12. Neonatologist = cares for premature and critically ill newborns.
13. Neurologist = a neurologist specializes in the diagnosis and treatment of all types of disease and functions of the brain, spine, peripheral nerves, muscles and nervous systems
14. Pediatrician (बाल (रोग) चिकित्सक) = a child's physician
15. Oncologist = A doctor who treats cancer 

.....

Thursday, 14 April 2016

Dr. B. R. Ambedkar





Born: 14 April, 1891 Passed Away: 6, December, 1956
1) Contribution
Dr B R Ambedkar, popularly known as Babasaheb Ambedkar, was one of the architects of the Indian Constitution. He was a well-known politician and an eminent jurist. Ambedkar's efforts to eradicate the social evils like untouchablity and caste restrictions were remarkable. The leader, throughout his life, fought for the rights of the dalits and other socially backward classes. Ambedkar was appointed as the nation's first Law Minister in the Cabinet of Jawaharlal Nehru. He was posthumously awarded the Bharat Ratna, India's highest civilian honor in 1990.
 
2) His Life
Bhimrao Ambedkar was born to Bhimabai Sakpal and Ramji on 14 April 1891 in Madhya Pradesh. He was the fourteenth child of his parents. Ambedkar;s father was a Subedar in the Indian Army and posted at Mhow cantonment, MP. After the retirement of his father in 1894, the family moved to satara. Shortly after, his mother passed away. Four years later, his father remarried and the family shifted to Bombay, where he cleared his matriculation in 1908. His father Bhimabai Sakpal died in Bombay, in 1912.
Ambedkar was a victim of caste discrimination. His parents hailed from the Hindu Mahar caste, which was viewed as "untouchable" by the upper class. Due to this, Ambedkar had to face severe discriminations from every corners of the society. a The discrimination and humiliation haunted Ambedkar even at the Army school, run by British government. Fearing social outcry, the teachers would segregate the students of lower class from that of Brahmins and other upper classes. The untouchable students were often asked by the teacher to sit outside the class. After shifting to Satara, he was admitted to a local school but the change of school did not change the fate of young Bhimrao. Discrimination followed wherever he went. In 1908, Ambedkar got the opportunity to study at the Elphinstone College. Besides clearing all the exams successfully Ambedkar also obtained a scholarship of twenty five rupees a month from the Gayakwad ruler of Baroda, Sahyaji Rao III. Political Science and Economics were the subjects in which he graduated from the Bombay University in 1912. Ambedkar decided to use the money for higher studies in the USA.
After coming back from the US, Ambedkar was appointed as the Defence secretary to the King of Baroda. Even, there also he had to face the humiliation for being an 'Untouchable'. With the help of the former Bombay Governor Lord Sydenham, Ambedkar obtained the job as a professor of political economy at the Sydenham College of Commerce and Economics in Bombay. In order to continue his further studies, in 1920 he went to England at his own expenses. There he was awarded honor of D.Sc by the London University. Ambedkar also spent few months at the University of Bonn, Germany, to study economics. On 8 June, 1927, he was awarded a Doctorate by the University of Columbia.

3) Dalit Movement
After returning to India, Bhimrao Ambedkar decided to fight against the caste discrimination that almost fragmented the nation. Ambedkar opined that there should be separate electoral system for the Untouchables and lower caste people. He also favored the concept of providing reservations for Dalits and other religious communities.
Ambedkar began to find ways to reach to the people and make them understand the drawbacks of the prevailing social evils. He launched a newspaper called "Mooknayaka" (leader of the silent). It was believed that, one day, after hearing his speech at a rally, Shahu IV, an influential ruler of Kolhapur dined with the leader. The incident also created a huge uproar in the socio-political arena of the country. 

4) Political career
In 1936, Ambedkar founded the Independent Labor Party. In the 1937 elections to the Central Legislative Assembly his party won 15 seats. Ambedkar oversaw the transformation of his political party into the All India Scheduled Castes Federation, although it performed poorly in the elections held in 1946 for the Constituent Assembly of India.
Ambedkar objected to the decision of Congress and Mahatma Gandhi to call the untouchable community as Harijans. He would say that even the members of untouchable community are same as the other members of the society. Ambedkar was appointed on the Defence Advisory Committee and the Viceroy's Executive Council as Minister for Labor. His reputation as a scholar led to his appointment as free India's first, Law Minister and chairman of the committee responsible to draft a constitution.

5) Framer of Constitution
Bhimrao Ambedkar was appointed as the chairman of the constitution drafting committee. He was also a noted scholar and eminent jurist. Ambedkar emphasized on the construction of a virtual bridge between the classes of the society. According to him, it would be difficult to maintain the unity of the country if the difference among the classes were not met.

                                                         6) Conversion to Buddhism
In 1950, Ambedkar traveled to Sri Lanka to attend a convention of Buddhist scholars and monks. After his return he decided to write a book on Buddhism and soon, converted himself to Buddhism. In his speeches, Ambedkar lambasted the Hindu rituals and caste division. Ambedkar founded the Bharatiya Bauddha Mahasabha In 1955. His book "The Buddha and His Dhamma" was published posthumously.
On October 14, 1956 Ambedkar organized a public ceremony to convert around five lakh of his supporters into Buddhism. Ambedkar traveled to Kathmandu to attend the Fourth World Buddhist Conference. He completed his final manuscript, "The Buddha or Karl Marx" on December 2, 1956.

                                                          7)
Death
Since 1954-55 Ambedkar was suffering from serious health problems including diabetes and weak eyesight. On 6 December, 1956 he died at his home in Delhi. Since, Ambedkar adopted the Buddhism as his religion, a Buddhist-style cremation was organized for him. The ceremony was attended by hundreds of thousands of supporters, activists and admirers. (clt.)

Sunday, 10 April 2016

बदाम

रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी उठून खावेत. यामुळे स्मरणशक्ती तल्लख होते. हा सल्ला अनेकजण देतात. मात्र यामागचे नेमके कारण काय  हे अनेकांना माहित नसते. मग जाणून घ्या भिजवलेल्या बदामांचे आरोग्यदायी फायदे.
•भिजवलेले बदाम का खावेत ?

बदाम हे आरोग्यदायी आहेत. त्यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहते. व्हिटामिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड यांनी परिपूर्ण असते. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून  घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही एन्जाईम्समुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच त्यांना रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषणता मिळण्यास मदत होते.
 


भिजवलेले बदाम खाण्याचे आरोग्यदायी फायदे -:
1.गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते

गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ  करण्यास मदत करतात. भिजवलेले बदाम मऊ असल्याने गरोदर  स्त्रियांना सहज पचायला शक्य असतात. म्हणूनच गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’
2. भिजवलेले बदाम पचनशक्ती सुधारण्यास मदत करते
‘जर्नल ऑफ फूड सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार कच्चे व भिजवलेले बदाम पाण्यात भिजवल्याने पचन सुधारते. कारण भिजवलेल्या  बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्स शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.
3. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते
रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी बदाम फारच फायदेशीर आहे. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’ यांच्यानुसार बदामातील  ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब प्रमाणात राहण्यास मदत होते. असे देखील या संशोधनातून पुढे आले आहे. विशेषतः 30 -70वयोगटातील पुरूंषांमध्ये  हा फरक प्रामुख्याने आढळून आला.
4. हृद्याचे कार्य सुधारते
जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुआर बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.
5. शरीरातील ‘बॅड कोलेस्ट्रेरॉल’ वर नियंत्रण ठेवते
आजकाल तणावग्रस्त जीवनशैली तसेच वेळीअवेळी खाल्ल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.  यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढल्याने हृदयविकार जडण्याची समस्या बळावत आहे.  बदामांमुळे शरीरातील ‘बॅड’ कोलेस्टेरॉल कमी होऊन ‘गुड’ कोलेस्टेरॉल वाढते. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !
6. वजन घटवण्यास मदत होते 
तुम्ही वजन घटवण्याच्या मिशनवर आहात ? मग नियमित भिजवलेले बदाम अवश्य खावेत. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटी रिलेटेड मेटॅबोलिक डिसऑर्डर’ यांच्या अहवालानुसार  बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.  बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते. जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज !

Friday, 8 April 2016

“...विचारांची गोष्ट...”

             चैत्राची सुरवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी असे मानतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादीत करावे.
तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपर्यंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे ‍‍विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.



              चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.)
                   अशाप्रकारे, पाडव्याची पार्श्वभूमी आपणाला माहितीच आहे. पाडव्यापासून मराठी नववर्षास सुरवात होते. साडेतीन मुहूर्तापैकी पाडव्याचा मुहूर्त महत्वाचा मानला जातो. या दिवशी खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार केलेले शुभ समजले जाते. प्रत्येकजण नवीन वर्षानिमित्त एकमेकांना शुभेच्छा देतात. अशाच या पाडव्याच्या दिवशी मागील वर्षी2015 मनामध्ये आपण एक BLOG सुरु करावा, असे मनात आले. आणि कोणतीही technical माहिती नसतांना PC समोर जाऊन बसलो, Blog बाबत internet वरून माहिती मिळवत एक-एक step पुढे जात, internet रेंजचा आमच्या ग्रामीण भागातील अडथळा बाजूला करून 10 ते 11 तासांच्या अथक प्रयत्नातून मी माझा हा Blog (dongaread.blogspot.in ) आपणासमोर आणला आहे. या घटनेला आज पूर्ण एक वर्ष लोटले. या एक वर्षात आपण माझ्या Blog ला केलेल्या visit आणि नोंदविलेल्या प्रतिक्रिया माझ्या प्रयत्नांना उभारी आणणाऱ्या आहेत.
या ब्लॉगवरील ज्या पोस्ट आहेत, त्या सर्व आपणासाठी सदासर्वदा useful अशाच आहे आणि त्याप्रमाणेच त्या टाकण्यात आल्या आहे. ( Select the Best ) कामाचा व्याप, नोकरीतील वाढती धावपळ आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे बऱ्याच पोस्ट संकलित आहे. पण, यापुढच्या नवीन वर्षात मनामध्ये अजूनही खूप काही करण्याचा मानस आहे. Blog संदर्भात अजूनही बरीच improvement करावयाची आहे. रतन टाटा यांचे एक वाक्य नेहमी माझ्या विचारांमध्ये ‘घोळत’ असते, “satisfied logo se duniya nahi banti.” जीवनामध्ये Extension महत्वाचे असते. या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कुठेतरी प्रत्येकाने आपला space निर्माण करावा, असे मला वाटते. असो......
यानिमित्ताने आपणाबरोबर काही विचार share करता आले. अजूनही आपणामधील संवाद वाढावा यासाठीचाच प्रयत्न माझा असेल. “ विचारांची गोष्ट ” मलातरी वाढवायची आहे...!
आपणास गुढी-पाडव्याच्या मनापासून खूप-खूप शुभेच्छा..!                from - adsir..!