Saturday, 25 February 2017

महत्वपूर्ण पुस्‍तकें और उनके लेखक

1. महात्‍मा गांधी - कांक्‍वेस्‍ट ऑफ शेलफ माई एक्‍सपेरीमेंट विद ट्रुथ, हिंद स्‍वराज, इंडिया ऑफ माई ड्रीम्‍स
2. उमा शंकर जोशी - निशीथ
3. मैथिली शरण गुप्‍त - साकेत
4. मुंशी प्रेमचंद - रंगभूमि, गोदान, शतरंज के खिलाड़ी, गबन, कायाकल्‍प, प्रेमाश्रय
5. पी.वी नरसिंह राव - द इन्‍साइडर
6. अटल बिहारी वाजपेयी - राजनीति की रपटीली राहें, संसद के तीन दशक
7. सुभाष चन्‍द्र बोस - द इंडियन स्‍ट्रगल
8. सरोजिनी नायडू - द गोल्‍डन थ्रेसहोल्‍ड़, द बर्ड ऑफ टाइम, द ब्रोकन विंग, द सांग्‍स ऑफ इंडिया
9. आर. के नारायण - मि.संपत, द गाइड़, माई डेज, द वेंडर ऑफ स्‍वीट़्स, द डार्करूम, टैलिस्‍मैन, मालगुडी ड़ेज
10. अरूंधती रॉय - द गॉड ऑफ स्‍मॉल थिग्ंस, एन ऑर्डिनेरी पर्सन्‍स गाइड़
11. डॉ राजेन्‍द्र प्रसाद - इंडिया डिवाइडेड
12. रवीन्‍द्र नाथ टैगोर - गीताजंली, क्रिसेंट मून, द गार्डनर, चांडालिका, द हंग्रो स्‍टोन्‍स, द कोर्ट डांसर, किंग ऑफ डार्क वेबंर, पोस्‍ट ऑफिस, दरिलिजन ऑफ मैन
13. जवाहर लाल नेहरू - एन ऑटो बायोग्राफी, डिस्‍कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्‍पसेज ऑफ वर्ल्‍ड हिस्‍ट्री
14. हरीसेन - इलाहबाद प्रशस्ति
15. वी. डी सावरकर - द इंडियन वार ऑफ इंडिपेन्‍डेंस
16. एस राधाकृषणन - हिंदू व्‍यू ऑफ लाइफ
17. अरविंद घोष - न्‍यू लैम्‍प्स फॉर ऑल्‍ड, लाइफ डिवाइन
18. वी एस कॉमथ - इंडिया ऑफ अवर ड्रीम
19. कुलदीप नैय्यर - इंडिया, द क्रिटिकल इयर्ज, द जजमेंट, इंडिया हाऊस, बियोन्‍ड द लाइन्‍स : एन ऑटोबायो ग्राफी
20. तवलीन सिंह - कश्‍मीर : ए ट्रेजडी ऑफ एरर्स
21. खुशवंत सिंह - ट्रेन टु पाकिस्‍तान, ट्रुथ लव एंड ए लिटिल मेलिस
22. डॉ. ए पी जे. अब्‍दुल कलाम - विंग्स ऑफ फायर (अरूण तिवाड़ी और अब्‍दुल कलाम), 2020 – ए विजन फोर द न्‍यू मिलेनियम, इग्‍नाइटेड माइड्ंस माई जर्नी
23. विष्‍णु - पंचतंत्र
24. भीष्‍म साहनी - तमस
25. पी जी. वुडहाउस - जीव्‍स
26. भगस्‍टा - पोइरोट (जासूसी कहानियां)
27. रस्किन - रस्‍टी
28. मैगस्‍थ्‍नीज - डंडिका
29. कालिदास - मेघदुत, मालविकाग्निमित्र, रघुवमसा कुमार संभवम्, शकुंतला, विक्रम उर्वसी
30. कार्ल मार्क्‍स - दास कैपिटल
31. जॉर्ज ओरवैल - नाइन्‍टीन एटी फोर
32. कृष्‍णदेवराय - अमुक्‍तमलयादा
33. सलमान रूश्‍दी - मिडनाइट चिल्‍ड्रन (1981), शेम (1983), द सैटेनिक वर्सेज (1988), मुर्स लास्‍ट साइ (1995)
34. भरत मुनि - नाट्य शास्‍त्र
35. जयप्रकाश नारायण - व्‍हाई सोश लिज्‍म
36. जे एम केन्‍स - एम्प्‍लायमेंट, इंट्रेस्‍ट ऐंड मनी
37. जे के राउलिग - हैरी पॉटर
38. जॉन रस्किन - अन्‍टू इ लास्‍ट
39. वराह मिहिर - पंच सिद्धन्तिका
40. भवभूति - उत्तरराम चरित, मालती माधव
41. कैथ्‍रिन मैयो - मदर इंडिया
42. विलियम शेक्‍सपीयर - मैकबेथ
43. मनोहर गलगांवकर - दि मैन हू क्ल्डि गांधी
44. सत्‍यजीत राय - माई इयर्स विद अपु
45. मोहन राकेश - आधे अधुरे
46. बंकिम चन्‍द्र चटर्जी - आनंद मठ
47. तुषार गांधी - लेट्स किल गांधी
48. विशाखा दत्त - मुद्रराक्षस, देवी चन्‍द्रगुप्‍तम
49. कल्‍हण - राजतंरगिणी
50. पाणिणी - अष्‍ठाध्‍यायी
51. कौटिल्‍य - अर्थशास्‍त्र
52. जयदेव - गीतगोविन्‍द
53. पंतजली - महाभाष्‍य
54. बाणभट्ट - कादम्‍बरी, हर्षचरित्र
55. माद्य - शिशुपालवध
56. जयानक - पृथ्‍वीराज विजय, प्रबंधकोष
57. सूर्यकांत त्रिपाठी निराला - अनामिका, गुंजन, परिमल, जूही की कली
58. तुलसीदास - दोहावली, कवितावली, विनय पत्रिका, रामचरित्र मानस
59. मलिक मुहम्‍मद जायसी - पद्मावत
60. बालगंगाधर तिलक - गीता रहस्‍य
61. अनीता देसाई - क्राई द पिकोक
62. वी. एस नॉयपाल - ए बेंड इन द रिवर
63. विक्रम सेट - टू लाइवज
64. आर. वेकटरमन - माई प्रसिडेसियल ईयर्स
66. एस राधाकृष्‍णन - द हिंदुं व्‍यू ऑफ लाइफ
67. एन सजीव रेड्डी - विदाऊट फियर ओर फेवर
68. नेल्‍सन मंडेला - लॉग वाक टू फ्रीडम

Thursday, 2 February 2017

कविता...तुझ्या नि माझ्या जीवनाची



एखाद्या रात्री कधीतरी
जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि
तडतडतात बाहुल्या...
मुक्यानेच सांगू लागतं
दुखलेलं पाणी,
इतकं हळवं चुकूनसुद्धा
असू नये कोणी..."
गाऊ नये कोणी कधी
उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं
इतकं होऊ नये ज्ञानी...
वाचूच नये मुळात कुठलं
जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो
दूर ठेवावं मस्तक...
जशी नजरेस दिसतात
तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात
तसेच समजावेत मित्र...
उगाच फार खोल आत
नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात
साऱ्या सुखांताच्या गोष्टी...
पेनाच्या जिभेवरच
सुकू द्यावी शाई,
फार त्रास होईल
असं लिहू नये काही...
हळवं बिळवं करणारे
मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची
सगळी दारं बंद...
सायंकाळी एकटं एकटं
फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये
आर्त, उत्कट सूर...
चालू नये सहसा फार
ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी
तर मिळवावेत हात...
जमल्यास चारचौघात
बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी
भांडावं उसळून...
आवडणार नाही
पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी
होऊ नये थोर...
घट्ट घट्ट बसलेल्याही
सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी
आणू नये आठी...
साकळू देऊ नये फार
खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित
होत जावं व्यक्त...
माणसांचं मनास
लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका
त्यांचासुद्धा भार...
तुटून जावीत माणसं
एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा
प्रत्येकालाच फोन...
ठेऊ नये जपून
वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत
असा गुंतवू नये प्राण...
जमा होत राहील
सारखा पापणीआड थेंब,
इतकंसुद्धा मन लावून
करू नये प्रेम...
श्वास घेणंसुद्धा अगदीच
वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून
जगण्याचा अर्थ...
वाटलं जर केव्हा
सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे
हे करून घ्यावं मान्य..
इतकं समजावूनसुद्धा
जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे,
थरथरतात बाहुल्या........
( संकलन )


Monday, 26 December 2016

गणिती उखाणे

चला गणित शिकुया.
गणिती उखाणे
सर्वांनी एक उखाना घेवू..... 


गणित विषयामध्ये सुञे पाठ होण्यासाठी *उखाणा* उपक्रम.
१) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ लांबी x रूंदी.
२) हिमालयातील काश्मिर म्हणजे भूलोकातील स्वर्ग
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे बाजूचा वर्ग.
३) देवीची ओटी भरू खणानारळाची
ञिकोणाचे क्षेञफळ म्हणजे १/२xपायाxउंची.
४) स्वातंञ्याची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ
सहाxबाजू वर्ग हे घनाचे पृष्ठफळ
५) तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची हे इष्टिकाचीतीचे घनफळ.

 
रविवार नंतर सोमवार येतो ....
रविवार नंतर सोमवार येतो.....
प्रत्येक रून संख्या चा वर्ग ...
नेहमीच धन.
*******************
महादेवाला आवडतात बेलाचे पान...
महादेवाला आवडता बेलाचे पान....
कोणत्याही ञिकोणात एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान....!!  
****************
भाजीत भाजी मेथीची.....
वर्तुळ माझ्या प्रितीची.....✍  ✍  
****************
स्वच्छता तेथे ईश्वर वसते,
स्वच्छता तेथे ईश्वर वसते,
अन,
शुन्यत्तेर संख्या चा घातांक शून्य असेल तर किंमत 1च असते !
********
भारताने मॕच जिंकली.....
चार गडी राखून .....
परिमिती काढतो मी....
आकृती आखून ....✍  ✍  ✍  
****************
दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे घ्यायला, सुवासिनी झाल्या गोळा..!!!  
***********
*झारखंड ची राजधानी रांची*
*ञिकोणाचे क्षेत्रफळ 1/2×पाया ×उंची*
***********
   जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा 
खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू ... चौरसाची परिमिती 4 × बाजु.*

**************
खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा 
विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा
****************
दहा किलो म्हणजे एक मन...!!
घनाचे घनफळ बाजूचा घन....!!
***************
*काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग....*
*चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग ...!!*
*******
*जीवाला जीव देतो तोच खरा मित्र*
*गणित सोडवायला माहिती  हवीत सुत्र*
**************
फुलात फुल चाफा,विक्री - खरेदी बरोबर नफा.
*****************
    सम आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार 
पहिल्यात असते गुणोत्तर तर दुसर्यात गुणाकार
*********
"गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
एक हजार लीटर....!!!!
******** 

Sunday, 11 December 2016

सोबत

आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …
इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!
ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.
मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”
सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.
लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.
मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.
‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –
“सोबत…!”
माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच.

Saturday, 15 October 2016

भारताचे नऊ सर्वोत्कृष्ट कमांडो फोर्स

                                                                        आज आपण ओळख करुन घेणार आहोत भारताचे महत्त्वाचे कमांडो फोर्स, ज्यांच्यासमोर शत्रू गुडघे टेकतात, अशा नऊ सर्वात घातक, शानदार आणि इंटेलिजंट कमांडो पथकांची ज्यांची गणना जगातील सर्वोत्तम सुरक्षा दलांमध्ये केली जाते.
१)  एनएसजी (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) किंवा ब्लॅक कॅट्स
एनएसजी हे भारताचं प्रमुख दहशतवादविरोधी दल आहे. यांच्या काळ्या रंगाच्या गणवेशामुळे त्यांना ‘ब्लॅक कॅट्स’ असं सुद्धा म्हणतात. एनएसजीची स्थापना 1968 मध्ये करण्यात आली होती. एनएसजीची निवड प्रक्रिया एवढी खडतर असते की ७०-८० टक्के उमेदवार नापास होतात. निवड झालेल्या जवानांना ९ महिने अत्यंत कठीण प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं.  एनएसजीमध्ये निवड झालेले कमांडो हे सैन्यदल, पोलिस आणि पॅरामिलिटरीमधील सर्वोत्कृष्ट जवान असतात. भारतीय पोलीस दलाचे महासंचालक एनएसजीचे प्रमुख असतात. एनएसजीकडे व्हीआयपी सुरक्षा आणि घातपाती कारवाया रोखण्याची जबाबदारी असते.
२)  एसपीजी म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप
हे कमांडो आपण पंतप्रधानांच्या आसपास पाहिले असतीलच. एसपीजीची स्थापना १९८८ मध्ये झाली होती. एसपीजी कमांडोकडे पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजीची स्थापना करण्यात आली होती. हे जवान अतिशय चपळ आणि सजग असतात तसेच अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असतात.
३) मार्कोस कमांडो 
काळी वर्दी, चेहरा काळ्या कपड्याने झाकलेला चेहरा आणि गॉगल असलेले मार्कोस कमांडो. मार्कोस हे भारताच्या नौदलाचे स्पेशल आणि सर्वात घातक कमांडो आहेत. 1987 मध्ये मार्कोसची स्थापना करण्यात आली होती.  मार्कोसना अतिरेकी ‘दाढीवाला फौज’ म्हणून ओळखतात. मार्कोस कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यास सज्ज असतात पण समुद्री सुरक्षेमध्ये ते विशेष पारंगत असतात. या कमांडोंकडे हवेतून समुद्रात उडी मारणं तसेच पाण्यातून डोकं बाहेर काढून गोळीबार करण्याची क्षमता असते.  त्यांचं प्रशिक्षण हे अत्यंत खडतर असतं. यासाठी अर्ज केलेले जवळपास ८०टक्के उमेदवार चाचणी फेरीतचं अयशस्वी होतात. मार्कोस कमांडो पूर्वी मरीन कमांडो फोर्स म्हणजेच एमसीएफने ओळखले जात होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या ऑपरेशनमध्ये मार्कोस कमाडोंना बोलवण्यात आलं होतं.
४)  गरुड कमांडो
हे भारतीय हवाई दलाचं विशेष पथक आहे. गरुड पक्षाच्या आधारावर या फोर्सचं नाव ठेवण्यात आलं आहे. एनएसजी आणि मार्कोसच्या धर्तीवर 2004 मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली होती. ‘गरुड’मध्ये जवळपास २००० जवानांचा समावेश आहे. हवाई हल्ले, रेस्क्यू ऑपरेशन, दहशतवादविरोधी कारवाया, हवाई  शोध मोहिमेत,  गरुड कमांडोंचा वापर केला जातो. यांचं प्रशिक्षण साधारण तीन वर्ष चालतं जे इतर सर्व सुरक्षा दलांपेक्षा जास्त आहे. 
५)  पॅरा कमांडो
पॅरा कमांडोंची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. ते भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटचा भाग आहेत. त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं, शत्रूवर मागून वार करून त्याची पहिली फळी उद्ध्वस्त करणे. जगातील अत्यंत कठीण प्रशिक्षण या कमांडोना दिलं जातं, जसं की ६०किलो वजन घेऊन रोज २०किमी धावणं. एलीट पॅरा कमांडोंना हवेत मारा करण्यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे कमांडो 30 ते 35 हजार फुटांच्या उंचीवरुन उडी मारण्यात तरबेज असतात. १९७१चं युद्ध, कारगिल युद्ध आणि ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ मध्ये पॅरा कमांडोंचा वापर करण्यात आला होता. भारतीय सैन्यातील हे एकमेव दल आहे ज्यांना अंगावर टॅटू काढण्याची मुभा असते. 
६)  फोर्स वन’
मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजीच्या धर्तीवर महाराष्ट्रात `फोर्स वन’ या कमांडो पथकाची 2010 मध्ये स्थापना करण्यात आली होती. यांच्याकडे मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 'फोर्स वन' पथक घटनास्थळी अवघ्या १५ मिनिटांत पोहोचते, जी जगातील सर्वात जलद वेळ आहे. सलाम... ३००० अर्जदारांपैकी २१६ जणांची निवड करून हे पथक बनवलं आहे. या जवानांना इस्राईली ‘मोसाद’ सैन्याने विशेष प्रशिक्षण दिलं आहे.
७)  कोब्रा म्हणजे कमांडो बटालियन फॉर रिझॉल्यूट अॅक्शन
कोब्राची स्थापना 2008 मध्ये झाली होती. कोब्रा बटालियन CRPF चाच एक भाग आहे या कमांडोंना गोरिला तंत्राचं ट्रेनिंग दिलं जातं. कोब्रा कमांडो जंगलात वेश बदलण्यापासून दबा देऊन हल्ला करण्यात तरबेज असतात. यांचा वापर मुख्यत्वे नक्षलविरोधी मोहिमेत केला जातो. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असं हे पोलिसांचं सर्वोत्तम दल आहे. तसेच  कोब्रा स्नायपर युनिटची गणना देशातील सर्वोत्तम सुरक्षा रक्षकांमध्ये होते.
८) घातक कमांडो
नावाप्रमाणेच हे कमांडो अतिशय घातक असतात. भारतीय लष्कराच्या प्रत्येक बटालियन मध्ये साधारण २० 'घातक' कमांडोंचा समावेश असतो. यांची मुख्य जबाबदारी म्हणजे बटालियनच्या पुढे राहून शत्रूच्या मुख्य ठिकाणांवर थेट हल्ला करणे, तेथून महत्त्वाची माहिती गोळा करणे, शत्रूच्या हालचालींवर करडी नजर ठेवणे, अपह्रत व्यक्तीला सोडवणे. शत्रूशी थेट सामना करावा लागत असल्याने या कमांडोना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम जवानांचीच घातक कमांडो म्हणून निवड केली जाते.
९) स्पेशल फ्रंटियर फोर्स
एस एफ एफ ची स्थापना १९६२ साली भारत-चीन युद्धानंतर करण्यात आली होती. एसएफएफचं मुख्यालय उत्तराखंडमधील चक्रता येथे आहे. ही फोर्स संरक्षण खात्याच्या अंतगर्त नसून ती भारतीय गुप्तचर खात्याच्या (रॉ) च्या अखत्यारीत काम करते आणि कॅबिनेट सचिवांना उत्तरदायी असते. या जवानांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी गोरिला तंत्र, पर्वत, जंगलातील कारवाया आणि पॅराशूट मधून उडी मारण्याचं प्रशिक्षण दिले जाते. एसएफएफने १९८५च्या सियाचीन युद्धात ऑपरेशन मेघदूत मध्ये प्रमुख भूमिका बजावली होती. 
---------------------------

Wednesday, 28 September 2016

चला गणित शिकूया

*वर्ग संख्या ट्रिक्स*
41 ते 50 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
41 चा वर्ग = 16 81
42 चा वर्ग = 17 64
43 चा वर्ग = 18 49
44 चा वर्ग = 19 36
45 चा वर्ग = 20 25
46 चा वर्ग = 21 16
47 चा वर्ग = 22 09
48 चा वर्ग = 23 04
49 चा वर्ग = 24 01
50 चा वर्ग = 25 00
वर्ग संख्यांच्या मांडणीकडे नीट लक्ष द्या
16,17,18,19,20,21,22,23,24,25 अशी चढत्या क्रमाची मांडणी तयार झालेली आहे, ती पहा. त्याचबरोबर
81,64,49,36,25,16,09,04,01,00 अशी उतरत्या क्रमाची 9,8,7,6,5,4,3,2,1,0 यांच्या वर्गाची मांडणी तयार झालेली आहे.
वरील दोन्ही मांडण्यांचा परस्पर संबंध ध्यानात ठेवणे सहज शक्य आहे.
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग :
सोपी रीत
51 ते 60 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग ध्यानात ठेवणे हा लेख वाचल्यानंतर सहज शक्य आहे.येथे केलेली मांडणी व थोडीशी स्मरणशक्ती वापरल्यास आपण कायमस्वरुपी 51 ते 60 चे वर्ग ध्यानात ठेवू शकतो व हवे तेव्हा आठवू शकतो.
51 चा वर्ग = 26 01
52 चा वर्ग = 27 04
53 चा वर्ग = 28 09
54 चा वर्ग = 29 16
55 चा वर्ग = 30 25
56 चा वर्ग = 31 36
57 चा वर्ग = 32 49
58 चा वर्ग = 33 64
59 चा वर्ग = 34 81
60 चा वर्ग = 36 00 (3500+100)
वरील मांडणीकडे लक्षपूर्वक पहा.
51 ते 59 च्या वर्गसंख्यांच्या मांडणीमद्ये 26,27,28,29,30,31,32,33,34 अशी क्रमवार चढती मांडणी तयार झालेली दिसते.त्याचबरोबर 01,04,09,16,25,36,49,64,81 अशी क्रमवार 1 ते 9 यांच्या वर्गाची चढती मांडणी दिसून येते.
60 च्या वर्गामद्ये क्रमवार पुढील साख्या 35 व क्रमवार पुढील 10 चा वर्ग 100 यांची बेरीज (3500+100= 36 00) अशी रचना तयार होते.
तसेच
91 चा वर्ग 82 81
92 चा वर्ग 84 64
93 चा वर्ग 86 49
94 चा वर्ग 88 36
95 चा वर्ग 90 25
96 चा वर्ग 92 16
97 चा वर्ग 94 09
98 चा वर्ग 96 04
99 चा वर्ग 98 01
100 चा वर्ग 100 00
अश्याप्रकारे आणखी निरीक्षणातून सोप्या ट्रिक्स तयार करू शकतात .

*गणित : महत्त्वाची सूत्रे.*
मूळ संख्या- फक्त त्याच संख्येने किंवा १ नेपूर्ण भाग जाणारी संख्या,
सम संख्या - २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या,
विषम संख्या - २ ने भाग न जाणारी संख्या,
जोडमूळ संख्या- ज्या दोन मूळ संख्यांत केवळ२ चा फरक असतो,
संयुक्त संख्या - मूळसंख्या नसलेल्या नैसर्गिकसंख्या.
*संख्यांचे प्राथमिक क्रियाविषयक नियम*
A)समसंख्या + समसंख्या= समसंख्या.
B)समसंख्या - समसंख्या= समसंख्या.
C)विषमसंख्या - विषमसंख्या = समसंख्या.
D)विषमसंख्या + विषमसंख्या= समसंख्या
E)समसंख्या × समसंख्या = समसंख्या.
F)समसंख्या × विषम संख्या = समसंख्या.
G)विषमसंख्या × विषमसंख्या= विषमसंख्या.

एक अंकी एकूण संख्या ९ आहेत तर दोन अंकी ९०,तीन अंकी ९०० आणि चार अंकी एकूण संख्या ९००० आहेत.
० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.

१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.

दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.
*विभाज्यतेच्या कसोटय़ा*
A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.
*B)३ ची कसोटी*-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.
*C)४ ची कसोटी*-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.
D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.
*E)६ ची कसोटी*-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.
*F)७ ची कसोटी*-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.
*G)८ ची कसोटी*-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.
*H)९ ची कसोटी*-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.
*I)११ ची कसोटी*-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.
*J)१२ ची कसोटी*-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.
*K)१५ ची कसोटी*-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.
*L)३६ ची कसोटी*-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.
*M)७२ ची कसोटी*-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.

*लसावि* - लघुत्तम सामाईक विभाज्य संख्या:
दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहानसंख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या

*मसावि* - महत्तम सामाईक विभाजक संख्या:
दिलेल्या संख्यांना ज्या मोठय़ात मोठय़ा संख्येने(विभाजकाने) भाग जातो ती संख्या

*प्रमाण भागिदारी*
A)नफ्यांचे गुणोत्तर= भांडवलांचे गुणोत्तर ×मुदतीचे गुणोत्तर,
B)भांडवलांचे गुणोत्तर= नफ्यांचे गुणोत्तर+मुदतीचे गुणोत्तर,
C)मुदतीचे गुणोत्तर = नफ्यांचे गुणोत्तर ÷ भांडवलाचे गुणोत्तर.

*गाडीचा वेग-वेळ-अंतर*
A) खांब ओलांडण्यास गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी ÷ ताशी वेग × १८/५
B) पूल ओलांडताना गाडीला लागणारा वेळ =गाडीची लांबी + पुलाची लांबी ÷ताशी वेग × १८/५
C) गाडीचा ताशी वेग=कापावयाचे एकूण अंतर ÷ लागणारा वेळ ×१८/५
D) गाडीची लांबी=ताशी वेग × खांब ओलांडताना लागणारावेळ × ५/१८
E) गाडीची लांबी + पुलाची लांबी = ताशी वेग× पूल ओलांडताना लागणारा वेळ + ५/१८
F) गाडीचा ताशी वेग व लागणारा वेळ काढताना १८/५ ने गुणा व अंतर काढताना ५/१८ ने गुणा
G) पाण्याच्या प्रवाहाचा ताशी वेग=नावेचा प्रवाहाच्या दिशेने ताशी वेग - प्रवाहाच्याविरुद्ध दिशेने ताशी वेग ÷ २

*सरासरी*
A) X संख्यांची सरासरी= दिलेल्या संख्येची बेरीजभागिले X
B) क्रमश:संख्याची सरासरी ही मधली संख्या असते.
C) X संख्यामान दिल्यावर ठराविकसंख्यांची सरासरी =(पहिली संख्या+शेवटची संख्या) ÷ X
D) X या क्रमश: संख्याची बेरीज =(पहिली संख्या + शेवटची संख्या) ×X÷ २

*सरळव्याज*
A)सरळव्याज=मुद्दल × व्याजदर × मुदत ÷१००
B)मुद्दल=सरळव्याज × १०० ÷ व्याजदर × मुदत
C)व्याजदर =सरळव्याज × १०० ÷ मुद्दल × मुदत
D)मुदत वर्षे=सरळव्याज×१००÷ मुद्दल×व्याजदर=>

( संकलन )

Saturday, 17 September 2016

मला आवडलेली कविता

  • विरामचिन्हांची कविता...   

    ( . ; ".." , : '..' [..] ? / {..} ! _ - | )

" वाक्य पूर्ण झाले
हसून सांगे पूर्णविराम.
दोन छोटया वाक्यांना
सहज जोडे अर्धविराम.
एका जातीच्या शब्दांमध्ये
येऊन बसे स्वल्पविराम.
वाक्याच्या शेवटी बोले
तपशिलात अपूर्णविराम.
प्रश्न पडतो तेव्हा
धावून येई प्रश्नचिन्ह.
भावनांच्या रसात बुडून
उभे राही उदगार चिन्ह.
शब्दावर जोर पाडी
अवतरणचिन्ह एकेरी
कुणी बोले तिथेच दिसे
अवतरणचिन्ह दुहेरी.
कुठे घ्यावा विराम हे
चिन्ह सांगे अचूक
चिन्हांच्या सोबतीने
वाक्य लिहू बिनचूक.
चिन्ह वगळून वाक्य कसे ओंगळवाणे दिसे.
चिन्हांमुळेच वाक्याचा
अर्थ मनी ठसे."
(...मातृभाषा सार्थ अभिमान...)

Sunday, 11 September 2016

साक्षी मलिक..कुस्तीपटू

साक्षी मलिकने कुस्तीमध्ये मिळवलेलं ऑलिंपिकचं ब्रॉन्झ मेडल लेखिका शोभा डे ना अर्पण केलं आहे. पत्रकार परिषदेत तिनं ही धक्कादायक घोषणा केली आणि पत्रकारांना तर क्षणभर काय विचारावं हेच सुचेनासं झालं. मात्र, ऑलिंपिक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेल्या साक्षीनं शोभा डेच नव्हे तर भल्या भल्याना शाब्दिक बाणांनी लोळवलं आणि पैलवान असले तरी भेजा पण तेज आहे असाच संदेश दिला. या पत्रकार परिषदेची ही झलक...
पत्रकार - तुम्ही शोभा डेंना पदक का अर्पण करताय? त्यांनी तर हा पैशाचा अपव्यय असून खेळाडू सेल्फी घ्यायला जातात अशी टीका केली होती. तुम्ही त्यांच्यावर राग तर नाही ना काढत आहात? साक्षी - छे.. छे.. मी त्यांच्यावर अजिबात रागावलेली नाहीये. तुम्हाला माहित्येय ना आपण भारतीय खूप भावनाप्रधान असतो. प्रोफेशनल खेळाडू असा जरी शिक्का बसलेला असला, तरी आपण सगळे भावनेशी ईमान राखतो. त्यामुळे मग पाकिस्तानला हरवल्यावर युद्ध जिंकल्यासारखं वाटतं. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये तर आपण बघितलं, कप हरल्यापेक्षा पाकिस्तानविरोधात जिंकल्याचा आनंद आपल्याला खूप झाला होता.
पत्रकार - याचा इथे काय संबंध?
साक्षी - संबंध आहे ना... शोभा डेंच्या वक्तव्यामुळे मला प्रेरणा मिळाली. प्रतिस्पर्धी समोर आला की मला सारखं, तिच्या तोंडातून ऐकायला यायचं, पैसे वर आलेत का?  चल सेल्फी काढुया का? आणि तिच्यावर मग त्वेषानं हमला करायचे आणि असं करत करत मी पदक जिंकलं. जर शोभा डे असं बोलल्या नसत्या तर मला कुठेतरी प्रेरणा कमी पडली असती असं वाटतंय. म्हणून मी मेडल त्यांनाच अर्पण केलंय.
पत्रकार - तुम्ही देशवासियांना काय संदेश द्याल?
साक्षी - देशाला संदेश देण्याएवढी मी महान नाहीये. पण मी एक नक्की विनंती करेन, की तोंड उघडताना आपण काय करतो आणि कुणाबद्दल काय बोलतोय याचं भान ठेवा. म्हणजे असं आहे की, समजा तुम्ही लेखिका आहात, तर तुम्ही लिहित असताना मनासारखं नाही झालं, तर परत लिहू शकता. अनेकवेळा लिहू शकता. मनासारखं होईपर्यंत छापणार नाही असं ठरवू शकता.
दुर्देवानं ही सवलत खेळाडूला नसते. यही मुकदमा, यही फैसला असा मामला असतो. एकदा रिंगमध्ये उतरलं की तुम्ही एकतर जिंकून बाहेर येता किंवा हरून. त्यामुळे तुमच्या कम्प्युटरमध्ये undo करायची जी सोय असते, ती आम्हाला नसते, याचा विचार जरूर करा.

पत्रकार - एका सिनेअभिनेत्याने पैलवानाची भूमिका केली आणि शुटिंगमधला अनुभव सांगताना झालेल्या कष्टांची तुलना रेप वुमनशी केली. याबद्दल काय सांगाल? साक्षी - खरं सांगू का? मी सिनेमाही बघत नाही आणि हीरो हिरोईनच्या मुलाखतीही. हीरो हिरोईन, नी दिग्दर्शक येतात मोठ्या खेळाडूंना बघायला, त्यांच्यावर सिनेमा बनवायला, त्यांच्याकडून सिनेमा बनवण्यासाठी माहिती घ्यायला. एका सिनेमासाठी ते कष्ट घेत असतील काही महिने, अनेक टेक रिटेक घेऊन... पण आम्ही तर 15- 15 वर्ष मेहनत घेत असतो, या अशा एका पदकासाठी. त्यामुळे सिनेमावाल्यांपैकी कुणाच्याही वक्तव्यावर काही न बोललेलंच बरं.
इतकंच नाही तर...भारतामधल्या युवा खेळाडूंना माझी नम्र विनंती आहे, जोपर्यंत खेळत आहात तोपर्यंत, खेळावरचे सिनेमे बघू नका. ते त्यांच्यासाठी असतात, ज्यांना खेळता येत नाही. ज्यांना खेळता येतं, त्यांनी फक्त खेळाचा सराव करावा, तेच आपलं काम आहे. सिनेमेवाल्यांना त्यांचं काम करू द्या आपण आपलं काम करूया.

पत्रकार - भारतामध्ये खेळांवर सरकार तितका खर्च करत नाही त्यामुळे चांगले खेळाडू होत नाहीत, पदकं मिळत नाहीत असं म्हटलं जातं. एका नेमबाजानंही असंच मत व्यक्त केलंय. तुम्हाला काय वाटतं?
साक्षी - हे बघा, सगळ्या गोष्टींचं खापर सरकारवर फोडून काय फायदा? खेळांवर खर्च होणारा पैसा बघितला, तर खरा किती खर्च होतो? नी मध्ये किती हडप होतो? हे तरी माहित्येय का? वशिल्याच्या खेळाडुंना घुसवणारे आणि दर्जेदार खेळाडुंवर अन्याय करणारे पदाधिकारी काय राजकारणी असतात का?
देशामधला सर्वसामान्य माणूस जितका भ्रष्ट असेल तितकंच भ्रष्ट इथलं सरकार असेल. त्यामुळे मला वाटतं की अशा बाबींवर खेळाडूने जास्त विचार करू नये. त्यानं जे उपलब्ध आहे त्याच्या सहाय्यानं दिवसरात्र मेहनत करून उत्कृष्ट खेळ करण्याचा प्रयत्न करावा.
पत्रकार - हे विचार फार आदर्श वाटत नाहीत का? किती जणं असा विचार करू शकणार?
साक्षी - आम्हाला अगदी सुरूवातीला एक शिकवलं जातं. फोकस करायला. लक्ष केंद्रीत करायला, मन एकाग्रचित्त करायला. याचा अर्थ असतो, आजुबाजुला कितीही विचलित करणाऱ्या गोष्टी असल्या तरीही ध्येयावरून, लक्ष्यावरून चित्त ढळता कामा नये. अब्ज लोकांचं दडपण बाजुला ठेवून केवळ पुढच्या चेंडूवर लक्ष केंद्रीत करू शकतो, तो सचिन तेंडुलकर होतो.
त्यामुळं हे आदर्श वाटत असलं तरी, ते खेळाडूसाठी आवश्यक आहे. बरं तुम्हाला, राजकारणी, सेलिब्रिटी, विचारवंत, वरीष्ठ, ज्येष्ठ, कुटुंब, टीकाकार, इत्यादींचा विचार खेळ सोडून करायचा असेल तर पत्रकार व्हा, खेळाडू कशाला होता.? ( I read this interview on media. )

Sunday, 4 September 2016

Mother n Child pairs

*Animals and their cries*

*Bee* - hums
*Bird* - twitters, chirps,sings,whistles
*Bull* - belows
*Camel* - grunts
*Cat*- mews, purs
*Cattle* - moo
*chicken*- clucks
*Cock*- crows
*Cricket*- chirps
*Crow*- caws
*Deer*- bells
*Dog*- barks,whines
*Donkey*- brays
*Dove*- coos
*Duck*- quacks
*Elephant* - trumpets
*Frog* - croaks
*Goat,Sheep* - bleats
*Horse* - neighs
*Lion,Tiger* - roars,growls
*Monkey* - chatters,gibbers,whoops
*Mouse* - sqeaks
*Parrot*- schreeches, talks
*Peacock* - screams
*Snake* - hisses
*Rabbit*- sqeaks
*Owl*- hoots
*Fly*- buzzes , hums
*Lamb* -bleats.

Wednesday, 31 August 2016

मनाचा उपवास..

शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्‍याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्‍याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे.
खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड *कुणाच्या हातात* आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो.
शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास करताना कधीतरी चुकुन, जुन्या सवयीमुळे उपासाला न *चालणारा* पदार्थ पटकन तोंडात गेला, म्हणून फार मोठे आभाळ कोसळणार नाही, की कोणी फाशी देणार नाही, जिथे चुक लक्षात आली तिथून देवाची क्षमा मागून, पुढे उपास सुरू ठेवावा.
आपण सोयीस्कर अर्थ काढून, "नाहीतरी आता उपवास *मोडलाच* आहे, तर आता वडा भजी ऊसळ मिसळ पण खाऊन घेऊया." असा विचार करणे चुकीचे ठरेल.
उपास कोणासाठी करायचा आहे ? देवासाठी की देहासाठी ?
खाण्यासाठी की देण्यासाठी ? आणि असे केलेले उपवास काही फलदायी होत नाहीत.

उपवास करायचा असेल तर एक विशिष्ट मानसिकता बनवावी लागते. मनाला संयमात ठेवावे लागते, मोहाचा त्याग करावाच लागतो.
जी गोष्ट किंवा वस्तु *सोडल्याशिवाय* ती मला हितकर होणार नाही, हे आपल्या मनाला आधी पटले पाहिजे.
म्हणजे  वैद्याने सांगितलेले पथ्यपालन करणे, हा देखील एक उपासच झाला ना !

ज्याचा हव्यास संपत नाही ते सुख ! आणि सुख जिथे संपते तिथे समाधान सुरू होते, हे जर खरे असेल तर उपास म्हणजे उपभोग घेण्याच्या मानसिकतेतून (यालाच *माया* असेही म्हणतात) बाहेर येणे. प्रपंचात राहून परमार्थाचा विचार करणे म्हणजे उपवास.
समर्थ म्हणतात, आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी । सर्व काळ मानसी, चिंतातुर ।।
आज संकष्टी आहे, पण रविवार बुधवार पण आहे, आता काय *धरावे* की संकष्टी *सोडावी* असा प्रश्न जरी मनात  निर्माण झाला, तरी अशी *कष्टाने केलेली संकष्टी* कशी पावणार ? त्याने समाधान कसे मिळणार ? 
उपासाला *सात्विक* अन्न खावे.
नेमकं *सात्विक* म्हणजे काय ?
जरूर असेल तेव्हाच  आणि तेवढेच अन्न खाणे म्हणजे *सात्विक* होय. मुख्य म्हणजे प्रत्येक घासाला भगवंताची (शास्त्रीची वा वैद्याची सुद्धा ) आठवण राहिली पाहिजे.
नाम घेता ग्रासोग्रासी तो जेविता राहिला,
उपवासी, असं तुकाराम महाराज पण सांगतातच !

आपल्या प्रकृतीचा विचार न करता, भुकेचा ( अग्निबलाचा ) विचार न करता, आजारांचा विचार न करता, स्वतःच्या मनाने ठरवून केलेला उपास हा फक्त अशक्तपणाच आणतो.
प.पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रापंचिक गोष्टींकरीता उपास ही गोष्टच मला मान्य नाही.
आपल्या मनामध्ये काहीतरी मिळावे म्हणून कितीही उपासासारखे कष्ट केलेत तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही.

महाराज म्हणतात, *उपासना* करा. उपास *ना* करा. ( संकलन )

Saturday, 20 August 2016

fair glow on face

*डॉ .हिला चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काहीतरी द्या ना !*
_"त्या तरूणीची आई सांगत होती.
ग्लो येण्यासाठी म्हणजे ?
चेहरा उजळण्यासाठी !...चेहरा असा चमकला पाहिजे."_
"*मग कानाजवळ दोन छोटे छोटे  एल ई डी  बल्ब लावा की ! सेलवरचे ! चेहरा आपोआप उजळेल."*
"_डॉक्टर ,तुम्ही चेष्टा करताय हं !"_
"नाही ,मी सीरियसली बोलतोय, चेहरा उजळण्यासाठी हा सर्वात चांगला उपाय आहे !"
"तसं नाही हो .....सध्या तिला बघायला रोज पाहुणे येताहेत.तेव्हा चेहरा चांगला दिसायला पाहिजे ना ! पाहा ना, चेहरा कसा निस्तेज दिसतोय ! एखादी क्रीम ,एखादा साबण असलं काहीतरी मिळालं तर बरं होईल. चेहऱ्यावर जरा  तेज यायला पाहिजे !"
Dr हसले
"का हसला ?"तिनं विचारलं.
"तू आधी काय वापरत होतीस?".
"फेअर अँड लव्हली ,फेअरएवर ,फेअरग्लो अशा बऱ्याच क्रीम लाऊन झाल्या ; पण फरक कशाचाच नाही !पाच वर्षांपासून हे नाही ते किंवा ते नाहीतर हे लावत असते पण थोडा तरी फरक पडावा ?काडीचाही फरक नाही."
"बरोबर आहे ; पडणारच नाही.चेहरा आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी याचा उपयोगच नाही.
🏻त्यासाठी  माणसाजवळ आत्मविश्वास असला पाहिजे.
🏻चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं.
🏻मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो.
🏻मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो.
🏻मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो.
🏻मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात
🏻तुमचा चेहरा हा तुमच्या विचारांचा आरसा असतो.जसे तुमचे विचार तसा तुमचा चेहरा." "आता काय बोलावं ?"
🏻"पाहा ना !इथं आल्यापासून तुमची मुलगी अजून एकही शब्द बोललेली नाही.सगळं तुम्हीच बोलताय ! 🏻माणसानं घडघड बोललं पाहिजे , 🏻खळखळून हसलं पाहिजे, दिलखुलास विनोद केले पाहिजेत , 🏻मनसोक्त रडलं पाहिजे.! थोडक्यात, स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवलं पाहिजे.
🏻त्यासाठी वाचन पाहिजे ,चिंतन पाहिजे ,खेळ पाहिजे.हे सगळं जवळ असेल तरच चेहरा सुंदर !...
🏻..आजपासून हे सुरू कर आणि मग बघ कसा फरक पडतो ते !.......
🏻लोक धबधबाच बघायला का जातात ? लोकांना पाण्याचं  साठलेलं डबकं का आवडत नसावं  ? माणसाचंही धबधब्याप्रमाणेच आहे ! चैतन्यमय व्यक्तिमत्व सगळ्यांनाच आवडतं !.....आणि असं व्यक्तिमत्व म्हणजेच तेजस्वी  चेहरा !
🏻 *व्यक्तिमत्व खुलवा चेहरा , आपोआप तेजस्वी होईल. जे लोक आरशाचा कमीत कमी उपयोग करतात तेच लोक जास्त सुंदर असतात !"

Tuesday, 16 August 2016

✏RTE- 2009 चे कलमे, त्या कलमांचे शीर्षक

✏RTE- 2009 चे कलमे- सदर अधिनियमात एकूण ३८ कलम आहेत. त्या कलमांचे शीर्षक, कलम क्रमांकानुसार खालीलप्रमाणे.
कलम क्रमांक १ = संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ.
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ = मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ = वयानुरूप प्रवेश (थेट).
कलम क्रमांक ५ = दाखला  हस्तांतरण.
कलम क्रमांक ६ = शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ = आर्थीक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ = शासनाची कर्तव्ये.
कलम क्रमांक ९ = स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये.
कलम क्रमांक १० = माता पिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ = शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ = शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ = प्रवेश फी व चाचणी पध्दत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ = प्रवेशास नकार.
कलम क्रमांक १६ = मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध .
कलम क्रमांक १७ = शारिरीक शिक्षा व मानसीक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ = शाळा स्थापनेस मान्यता .
कलम क्रमांक १९ = शाळेसाठी मानके व निकष .
कलम क्रमांक २० = अनुसूचीमध्ये सुधारणा अधिकार .
कलम क्रमांक २१ = शाळा व्यवस्थापन समिती .
कलम क्रमांक २२ = शालेय विकास योजना .
कलम क्रमांक २३ = शिक्षक नेमणूक,अहर्ता व अटी शर्ती.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये.
कलम क्रमांक २५ = विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
कलम क्रमांक २६ = शिक्षकाची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ = शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मुल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ = बालकाच्या हक्काचे सरंक्षण.
कलम क्रमांक ३२ = गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ = राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३४ = राज्य सल्लागार परिषदेची स्थापना.
कलम क्रमांक ३५ = निदेश देण्याचा अधिकार.
कलम क्रमांक ३६ = खटला चालविण्यास पूर्वमंजुरी.
कलम क्रमांक३७ = सदभावनापुर्वक कारवाईस संरक्षण.
कलम क्रमांक ३८ = समुचित शासनास नियम करण्याचा अधिकार.

Friday, 12 August 2016

तुम्ही मरताय हळूहळू...

तुम्ही प्रवासाला नाही जात, भटकत नाही.
तुम्ही वाचतच नाही काही,
जगण्याच्या हाका पडतच नाहीत तुमच्या कानावर,
चुकून कधी नाही देत, तुम्ही स्वत:च्याच पाठीवर शाबासकीची थाप.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू...!


स्वत:चं मन मारून, तडजोड करून जगता तुम्ही.
मायेनं कुणी मदत करायला येतं, तर ते ही नाकारता तुम्ही.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू...!


सवयींचे गुलाम बनता आहात तुम्ही,
रोज त्याच त्या मळक्या वाटेवर चालताय तुम्ही,
चुकून कधी नव्या रस्त्यानं जाऊन पाहत नाही,
चुकून कधी वाट चुकत नाही,
परक्या अनोळखी माणसांना भेटत नाही,
त्यांच्याशी काही बोलत नाही,
अंगावर चढवत नाही, नवेकोरे पूर्वी न वापरलेले रंग.
याचा अर्थ, तुम्ही मरताय हळूहळू...!


छातीत धडधडतच नाही तुमच्या,
तुमचं पॅशन काय हेच आता आठवत नाही तुम्हाला,
भावनांचा अतिरेकी कल्लोळ नाही जाणवत आतल्या आत,
नाही तुटत पोटात, नाहीच येत पाणी डोळ्यात.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू...!


या कामात मन रमत नाही, असं वाटतं;
तरीही तुम्ही चिकटून बसता त्याच नोकरीला.
नाही पटत ‘त्या’ व्यक्तीशी तरी,
संपलंय प्रेम हे माहितीये तरी,
तुम्ही रेटत बसता ते नातं,
आयुष्य बदलण्याचा धोकाच नको म्हणता,
सोडत नाही चाकोरी,
झपाटून झोकून देत नाही स्वत:च्या स्वप्नांसाठी स्वत:ला,
तोलूनमापून सुरक्षित जगण्याचे सल्ले झुगारून देत,
एक संधीही देत नाही स्वत:ला,
स्वत:साठी जगण्याची.
आयुष्यच बदलून टाकण्याची.
याचा अर्थ तुम्ही मरताय, हळूहळू...!

- पाब्लो नेरुदा,
नोबेल पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध कवी.

Friday, 5 August 2016

How to join NDA (National Defence Academy)

तयारी एन.डी.ए ची…!!!    
(ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.)

                                                                          ......हर्षल आहेरराव, संचालक, सुदर्शन अकॅडमी, नाशिक
         देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या सौरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे सौरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.
         भारतीय संरक्षणदले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए" च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पहाणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए, खडकवासला, पूणे  येथे करवून घेतली जाते.
पात्रता:
शैक्षणिक पात्रता:
         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विद्यान किंवा वाणिज्य शाखेचा असावा आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.

वयोमर्यादा:
         एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय साडेसोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.

निवड प्रक्रिया:
         एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.

प्रवेश परीक्षा:
         एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.

सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:
         भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.

पहिला टप्पा:
         या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.

दुसरा टप्पा:
         या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group  Tasks) व वयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चार्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test  (PABT) ही आणखी एक चाचणी होते.
         मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.

एन.डी.ए मधील प्रशिक्षण:
         एन.डी.ए मधील प्रशिक्षण कालावधी हा तीन वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए मधील तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो. येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहोणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी अधिकर्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.एचे तीन वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.एच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.एच्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:
         एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. Para Jumping, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायमिंग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते. सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, आभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या Management कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील  लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.

अर्ज कधी करावे:
         जून २०१६ मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.एच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए प्रवेशासाठी परीक्षा दि. १८ सप्टेंबर रोजी घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.एच्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा दि. १७ एप्रिल रोजी घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.एच्या तयारीसाठी करावा. 

शालेय विद्यार्थ्यांसाठी: 
         सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए मध्ये दाखल होऊ शकतात.

एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:
१. सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:
        येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती www.sainiksatara.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२. राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून: ६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:
         येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती www.rimc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

३. सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिटयूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:
         या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या आभ्यासाबरोबरच एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी यंदा १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे २०१६ मध्ये घेण्यात येईल.

         अनेक पालकांची आपल्या पाल्याला एन.डी.ए मध्ये पाठविण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्ग माहीत  नसल्यामुळे त्यांचे पाल्य एन.डी.ए प्रवेशास मुकतात. बर्याच पालकांचा असा गैरसमज असतो की एन.डी.ए ला जाण्यासाठी घोड्सवारी, रायफल शुटींग जमणे किंवा जिमला जाणे आवशक आहे. परंतु वरील माहिती वरून आपल्या लक्षात येईल की एन.डी.एच्या लेखी परीक्षेसाठी ११वी व १२वी च्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडावेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी एन.डी.ए निवडी मधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गेष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की एन.डी.ए ला निवड झालेले बरेचशे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. एन.डी.ए मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगल वर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकर्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलिस हवालदाराचा मुलगा असे बिगर लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले एन.डी.ए मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या, एन.डी.एला जाण्याचे आपले ध्येय्य निश्चित करा आणि लागा तयारीला.

Thursday, 28 July 2016

* शरीर स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी *

(१) ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात अॅसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
 (२) शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
(३) १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
(४) ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
(५) ४८ प्रकाचे रोग ऎल्युनियम भांडी वापरल्याने होतात.त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास होवा म्हणून वापरत.
(६) तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
(७) मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
(८) जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
(९) केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
(१०) गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
(११) स्नान करताना कधीही पटकण डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा अॅटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
(१२) उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
(१३) जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
(१४) कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
(१५) रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
(१६) जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व अॅसिडिटी होत नाही.
(१७) सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चोळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
(१८) नेहमी पाणी ताजे प्यावे,विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
(१९) पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
(२०) गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
(२२) स्वैयपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
(२३) मातीच्या भांडयात स्वैयपाक केल्यास १००% पोषक, काशाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९७%  पोषक, पिताळाच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ९३% पोषक, अल्युमिनियमच्या भांडयात स्वैयपाक केल्यास ७ ते १३% पोषक असते
(२४) गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
(२५) १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
(२६) खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
(२७) भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
(२८) पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
(२९) खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
(३०) कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
(३१) लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
(३२) फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
(३३) सकाळचे भोजन राजकुमारा सारखे तर दुपारचे भोजन राजा सारखे आणि रात्रीचे भोजन भिकारयासारखे असते व असावे.
           ... @ किडनी साफ करा फक्त ५/- रूपया मध्ये
                   उपाय:-
     कोथींबीर  घ्या बारीक चिरुन घ्या.  पाणी उकळून त्यात कोथींबीर टाका गॅस बंद करून झाकण ठेवा (५ मिनीट),नंतर गाळून घ्या आणि रोज १ग्लास ठीक १५दिवस पीत रहा लघवीने बारीक बारीक कण निघता निघता पुर्ण बाहेर निघून किडनी पुर्ण पणे साफ होईल. ( Sankalan )